शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सचिवांनी केले कामकाज तहकूब!

By admin | Updated: July 22, 2015 01:12 IST

विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याची अभूतपूर्व घटना घडली. सचिवांचे हे कृत्य घटनाबाह्य

मुंबई : विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याची अभूतपूर्व घटना घडली. सचिवांचे हे कृत्य घटनाबाह्य असल्याचे मत शेकापच्या जयंत पाटील यांनी व्यक्त केले. नेहमीप्रमाणे विधान परिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता सुरू होणार होते. त्यासाठी रिवाजानुसार ९.५५ वाजता कोरमची बेल वाजू लागली. मात्र १० वाजले, तरी बेल थांबली नाही की कामकाजही सुरू झाले नाही. १०.१० मिनिटांपर्यंत बेल वाजतच राहिली. पण सभागृहात सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांच्यापैकी कुणीही हजर नसल्याने विधान परिषद सचिवांनी सव्वा दहा वाजता सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांकरिता तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. साडे दहा वाजता कामकाज सुरू झाले तेंव्हा तालिका सभापती रामनाथ मोते हे उपस्थित होते. मोते यांनी पाऊस आणि ट्रॅफीकमुळे उशीर झाल्याचे सांगत सभागृहाची माफी मागितली. शेकापचे जयंत पाटील यांनी मात्र या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला. आता, सभागृहाचे कामकाज सचिव चालविणार का, असा सवाल करतानाच सचिवांना तसा अधिकार नसल्याचे पाटील म्हणाले. ठरलेल्या वेळी सभापती, उपसभापती अथवा चार तालिका सभापती कोणीच उपस्थित नाही. त्यामुुळे सचिवांनी कामकाज पुढे ढकलल्याची घोषणा करणे ही सभागृहाच्या नियमांची पायमल्ली असल्याचे पाटील म्हणाले. सभागृहाचे नियम व परंपरांची जपणूक करताना अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये, असे जयंत पाटील म्हणाले.