शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह

By दीपक भातुसे | Updated: April 11, 2024 11:04 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- दीपक भातुसेमुंबई - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आणि केलेल्या जागा वाटपावर पक्षातूनच नाराजी वाढताना दिसत आहे. काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे मतदारसंघांचे वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाची चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबई काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अथवा इतर नेत्यांनी मुंबईच्या जागांबाबत कोणतीच चर्चा केली नाही. उद्धवसेनेने दिलेल्या जागा निमूटपणे काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केल्याचा दावा मुंबई काँग्रेसमधील एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे वर्षा गायकवाड तीव्र नाराज असून मंगळवारी जागा वाटप जाहीर झाल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. दोन दिवस काँग्रेसचे नेते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे बुधवारी गायकवाड यांनीच मुंबई काँग्रेसच्या बोलवलेल्या बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळे ही बैठकही रद्द करावी लागली. जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई काँग्रेसचा बळी दिल्याची भावना मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

उत्तर मुंबईची जागा घेऊ नये अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र नको असलेली आणि तिथे ताकद नसलेली उत्तर मुंबईची जागा काँग्रेसकडे घेण्यात आली. दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसची ताकद असताना ही जागा उद्धवसेनेसाठी सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे.

दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सांगलीत ताकद नसताना उद्धवसेनेने ज्या पद्धतीने सांगलीची जागेसाठी किल्ला लढवला, त्यापुढे काँग्रेसचे नेते कमी पडल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. भिवंडीबाबतही शरद पवार गटाच्या हट्टापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचे काँग्रेसमधील पदाधिकारी सांगत आहेत.काँग्रेसमधील ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह मिटवण्याचे आवाहन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४