शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह

By दीपक भातुसे | Updated: April 11, 2024 11:04 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- दीपक भातुसेमुंबई - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आणि केलेल्या जागा वाटपावर पक्षातूनच नाराजी वाढताना दिसत आहे. काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे मतदारसंघांचे वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाची चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबई काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अथवा इतर नेत्यांनी मुंबईच्या जागांबाबत कोणतीच चर्चा केली नाही. उद्धवसेनेने दिलेल्या जागा निमूटपणे काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केल्याचा दावा मुंबई काँग्रेसमधील एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे वर्षा गायकवाड तीव्र नाराज असून मंगळवारी जागा वाटप जाहीर झाल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. दोन दिवस काँग्रेसचे नेते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे बुधवारी गायकवाड यांनीच मुंबई काँग्रेसच्या बोलवलेल्या बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळे ही बैठकही रद्द करावी लागली. जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई काँग्रेसचा बळी दिल्याची भावना मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

उत्तर मुंबईची जागा घेऊ नये अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र नको असलेली आणि तिथे ताकद नसलेली उत्तर मुंबईची जागा काँग्रेसकडे घेण्यात आली. दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसची ताकद असताना ही जागा उद्धवसेनेसाठी सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे.

दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सांगलीत ताकद नसताना उद्धवसेनेने ज्या पद्धतीने सांगलीची जागेसाठी किल्ला लढवला, त्यापुढे काँग्रेसचे नेते कमी पडल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. भिवंडीबाबतही शरद पवार गटाच्या हट्टापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचे काँग्रेसमधील पदाधिकारी सांगत आहेत.काँग्रेसमधील ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह मिटवण्याचे आवाहन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४