शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राजकीय घडामोडींची स्क्रिप्ट अजुनही पवारांच्याच दिग्दर्शनात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 16:58 IST

निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे निर्णय शरद पवारांवरच सोपविले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत कित्येक दिवसांपासून पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींची संपूर्ण स्क्रिप्ट अजुनही पवारांच्या डारेक्शनखालीच पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे. 

मुंबई - सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आता काही वेळ शिल्लक आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या अटीमुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा अद्याप केला नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती केवळ शरद पवारांमुळे असल्याची चर्चा असून महाराष्ट्रातील राजकारणाची स्क्रिप्ट अजुनही पवारांच्याच दिग्दर्शनाखाली सुरू असल्याचे दिसून येते. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे सोबत निवडणूक लढणारे भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी शक्यता होती. मात्र शिवसेनेने घेतलेल्या 50-50 च्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. त्याच बळावर भाजपने शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला केवळ चार मंत्रीपदं आली होती. आता राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरित्या आपला कल शिवसेनेच्या बाजुने दाखवला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण एक वळणावर येऊन ठेपले आहे. 

दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून दूर राहतो की का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे निर्णय शरद पवारांवरच सोपविले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत कित्येक दिवसांपासून पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींची संपूर्ण स्क्रिप्ट अजुनही पवारांच्या डारेक्शनखालीच पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे.