शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

राजकीय घडामोडींची स्क्रिप्ट अजुनही पवारांच्याच दिग्दर्शनात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 16:58 IST

निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे निर्णय शरद पवारांवरच सोपविले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत कित्येक दिवसांपासून पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींची संपूर्ण स्क्रिप्ट अजुनही पवारांच्या डारेक्शनखालीच पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे. 

मुंबई - सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आता काही वेळ शिल्लक आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या अटीमुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा अद्याप केला नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती केवळ शरद पवारांमुळे असल्याची चर्चा असून महाराष्ट्रातील राजकारणाची स्क्रिप्ट अजुनही पवारांच्याच दिग्दर्शनाखाली सुरू असल्याचे दिसून येते. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे सोबत निवडणूक लढणारे भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी शक्यता होती. मात्र शिवसेनेने घेतलेल्या 50-50 च्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. त्याच बळावर भाजपने शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला केवळ चार मंत्रीपदं आली होती. आता राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरित्या आपला कल शिवसेनेच्या बाजुने दाखवला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण एक वळणावर येऊन ठेपले आहे. 

दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून दूर राहतो की का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे निर्णय शरद पवारांवरच सोपविले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत कित्येक दिवसांपासून पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींची संपूर्ण स्क्रिप्ट अजुनही पवारांच्या डारेक्शनखालीच पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे.