शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

शिस्तीची फोडली डरकाळी

By admin | Updated: August 4, 2016 01:11 IST

कोणत्याही विभागातील बेशिस्तपणा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

पिंपरी : कोणत्याही विभागातील बेशिस्तपणा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील कामातील दुर्लक्षाबाबतची कबुली दिली. तसेच सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांना बदलण्याचे संकेत दिले. थेरगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नव्याचे नऊ दिवस संपले, आता कारवाई करा,’ असे अजित पवार यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना जाहीर व्यासपीठावरून सुनावले होते. त्यानंतर शहरातील कचरा समस्येबाबत नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले होते. आरोग्य प्रश्न गंभीर होत असल्याने सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांना राज्य सरकारकडे परत पाठविण्याची मागणी केली. तसेच शहरातील सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याने शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली होती. महापालिका क्षेत्रात स्वच्छ या संस्थेच्या वतीने योग्य प्रकारे काम केले जात नाही. घरापुढील रस्त्यावर कचरागाडी न आणता या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धटपणे वर्तन केले जात असल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. पवारांनी आयुक्तांचे कान टोचल्यानंतर कडक धोरण आयुक्तांनी स्वीकारले आहे. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘आरोग्य समस्यांबाबत सदस्यांनी तक्रारी केल्या. याची शहानिशा केली आहे. काही कर्मचारी काम करीत नसतील, कामगार संघटना कर्मचाऱ्यांवरील कारवाईला विरोध करत असेल, तर हा विरोध मोडून काढत कामचुकारांवर निलंबनाची कारवाई करा.’’ (प्रतिनिधी)>एकाच संस्थेला काम, काम न करणाऱ्या संस्था काळ्या यादीत कचऱ्याबाबतही व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक सुरू केला होता. त्यास प्रतिसाद न मिळाल्याचे आयुक्तांनी सांगितले. कचरा उचलणाऱ्या संस्थेस काळ्या यादीत टाका, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यावर आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘कचरा गोळा करण्याचे काम वेगवेगळ्या संस्थांना दिले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे प्रशासनास जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे कचरा गोळा करणे आणि तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे ही कामे वेगवेगळ्या संस्था करतात. त्यामुळे एकाच संस्थेस हे काम द्यायला हवे. ‘स्वच्छ’विषयी तक्रारी आल्या आहेत. काम योग्य प्रकारे न करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशा सूचना दिल्या आहेत.’