शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

स्कील्ड महाराष्ट्र हवा की स्कॅम महाराष्ट्र?

By admin | Updated: October 8, 2014 00:45 IST

राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेतून दूर करा, तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवा,

मोदींचा नागपुरात सवाल : सत्ता आल्यास विकासनागपूर : राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेतून दूर करा, तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवा, काँग्रेसने घोटाळे दिले, भाजपचे सरकार आले तर कुशल महाराष्ट्र (स्कील्ड महाराष्ट्र)घडवू , असा विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची येथील कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा झाली. त्यावेळी मोदी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती उपस्थित होते.भाषणाची सुरुवात मराठीतून करीत मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचार काळातील सभांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाचा उल्लेख केला. लोकसभेच्या तुलनेत आता लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेतला तर हवेची दिशा कोणत्या बाजूने आहे, हे कळून चुकेल. राजकीय पंडितांनी याचा अंदाज घ्यावा, अन्यथा लोकसभेप्रमाणे त्यांचे अंदाज चुकतील आणि लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्षांपासून आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. या काळात दोन पिढ्या बरबाद झाल्या. महाराष्ट्र समृद्ध असेल तर देश समृद्ध होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत घोटाळ्याचे (स्कॅम) सरकार दिले, भाजपला सत्ता दिली तर आम्ही ‘स्कील्ड’ सरकार देऊ. १५ वर्षांच्या पापी सरकारला १५ तारखेला मतदान करून दूर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर स्कील्ड डेव्हलपमेंटसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात यासंदर्भात एक सामंजस्य करारही करण्यात आला. त्यानुसार भारताने हजार तज्ज्ञांची मागणी अमेरिकेला केली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल व त्यातून एका कुशल महाराष्ट्राची जडणघडण होईल. केंद्राची विकासाच्या क्षेत्रात गतीने वाटचाल सुरू आहे. हे करताना आम्हाला महाराष्ट्राला सोबत घ्यायचे आहे. दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राचे चित्र पालटून देऊ, असे मोदी म्हणाले.मुख्यमंत्र्यांवर टीकाजो मुख्यमंत्री माझ्या बाजूला बसायला घाबरतो तो सोबत काम कसे करेल, असा टोला मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री का आले नाही? केंद्र आणि राज्याने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे. पक्ष वेगवेगळे असू शकतात, पण देश एक आहे. एकसंघपणे काम करण्याची संस्कृती रुजविण्याचे आमचे प्रयत्न आहे. भाजपने कधीही राजकीय भेदभाव केला नाही. देशाचे पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जयंतीपासून म्हणजे १४ नोव्हेंबरपासून तर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण भारतात शाळाशाळांमध्ये मुलांना स्वच्छतेची शिकवण देणारी मोहीम राबविली जाईल व २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर मिळेल अशी योजना राबविली जाईल, असे मोदी म्हणाले.देशात ६० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण ते कधीही त्यांच्या कामाचा हिशेब देत नाही. पण आम्हाला ते ६० दिवसांच्या कामाचा हिशेब मागतात. ६० दिवसांत केंद्र सरकारने अनेक कामे केली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्ता सुरू करण्यास चीनने मान्यता दिली; त्यामुळे वृद्धांनासुद्धा आता मोटारीने तेथे जाता येईल. पूर्वी हे शक्य नव्हते. भारताचे अमेरिकेत नाव झाले. लोकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राची सत्ता भाजपला मिळाली तर देशातही या राज्याचा लौकिक वाढविला जाईल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी जाहीर सभेत चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अहिर यांनी कोळसा घोटाळा संसदेत उघड केला तर फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेत अनेक घोटाळे उघड केले. फडणवीस यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल पुरस्कारही मिळाला. अशा तरुण नेत्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा मी आभारी आहे, असे मोदी म्हणाले.सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, देवेंद्र फडणवीस, सुलेखा कुंभारे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार व भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाचे उमेदवार अनुक्रमे विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गिरीश व्यास यांनी तर आभार आमदार अनिल सोले यांनी मानले. (प्रतिनिधी)