शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागरिकांना शोधण्यासाठी श्वानपथकाची मदत

By admin | Updated: August 2, 2014 02:52 IST

माळीण गावावर पडलेला तब्बल २५ फूट मातीचा ढिग हलविण्याचे काम अद्याप सुरू असून शुक्रवारी मुख्य गावापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे (एनडीआरएफ) पथक पोहोचले

अवसरी : माळीण गावावर पडलेला तब्बल २५ फूट मातीचा ढिग हलविण्याचे काम अद्याप सुरू असून शुक्रवारी मुख्य गावापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे (एनडीआरएफ) पथक पोहोचले. धान्याच्या कणग्या, भांडी, फोटो आणि इतर जीवनोपयोगी वस्तूंसह मृतदेह सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. दबलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी एनडीआरएफचे श्वानपथकही आणण्यात आले होते. मात्र, चिखल व पावसामुळे नागरिकांचा शोध घेण्यात श्वानांना यश आले नाही.घटनेला तीन दिवस उलटून गेल्याने गावामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सात जेसीबी मशिनद्वारे ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांचे शोधकार्य सुरू आहे. जेसीबी तसेच यंत्राच्या साह्णाने माती बाजूला केली जात आहे. या ढिगाऱ्याखाली दबलेल्या जीवंत नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या उदय, बर्ली, बर्कली, बेंगल या चार श्वानांना घटनास्थळी आणण्यात आले. मात्र, चिखल आणि पावसामुळे श्वानांना माग काढता आला नाही.मुख्य गावठाणाच्या ठिकाणी शोधकार्य सुरू झाले असून मातीचा थर चिकट आणि घट्ट झाल्याने जेसीबी यंत्रांना ढिगारा उपसण्यात काहीसा जोर लावावा लागत होता. गावातील काही भाग मोकळा झाल्याने शुक्रवारी पोकलेन मशीनची संख्या वाढवून सात करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पोलीस अधीक्षक मनोज लोहिया घटनास्थळी थांबून परिस्थितीवर देखरेख करीत होेते. मदत कार्यातील अडथळा येऊ नये म्हणून पोलीस तैनात होते. मात्र बघ्यांनी बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे माळीण फाटा ते अडीवरे या दरम्यानची वाहतुकीची कोंडी आजही कायम होती. (वार्ताहर)