शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची होणार राष्ट्रीय ’ गुणवत्ता संपादन चाचणी, अमरावती  जिल्ह्यात १६३ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:06 IST

देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे निवडलेल्या १६३ शाळांमध्ये लेखी चाचणी, १३ नोव्हेंबर रोजी परीक्षाअभ्यासक्रमावर आधारित मूल्यमापन प्रक्रिया होणारपरीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणारप्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती : देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत चाचण्यांचा पर्याय शोधण्यात आला. ती गुणवत्ता तपासण्यासाठी देशातील सर्व राज्यांतील शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता वाढविण्यासाठी काम केले जाते. देशपातळीवर दिल्लीत ह्यन्यु प्राह्णतर्फे देशभरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. सीलबंद प्रश्नपत्रिका त्या-त्या शाळांच्या ठिकाणी पोहोचल्या असून परीक्षेच्या दिवशी ते फोडण्यात येतील. या चाचणीचे स्वरूप शिक्षक प्रश्नावली असे असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नावलीत पर्यायी प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्यायांना विद्यार्थ्यांनी गोल करणे अभिप्रेत आहे.

तिसरी, पाचवीसाठी ४५ गुण यामध्ये भाषा विषयासाठी १५ गुण, गणित विषयासाठी १५ आणि परिसर अभ्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. तर आठवीसाठी ६० गुण यामध्ये भाषा १५ गुण, गणित १५, सामान्य विज्ञान १५ गुण, समाजशास्त्र १५ गुण असणार आहेत. तिसरी व पाचवीसाठी ९० ते १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राखीव आहे.

चाचणीच्या दिवशी शासकीय स्तरावरून स्वतंत्र होत पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांच्यामार्फत परीक्षा नियंत्रित केली जाणार आहे. या चाचणीसाठी पाचपेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांची चाचणीसाठी निवड केली आहे. यात जिल्ह्यातील १६३ शाळांची निवड केली आहे. यात तिसरी, पाचवीतील प्रत्येकी ६१, तर आठवीच्या ६१ शाळा आहेत. यात १७३ वर्गांचा समावेश आहे.स्वतंत्र अभ्यासक्रम नाहीया परीक्षेच्या निमित्ताने अभ्यासक्रम कोणता, असा प्रश्न शाळांना पडला आहे. या चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. सर्व प्रश्न इयत्तेच्या क्षमतेवर आधारित असणार आहेत. त्यामुळे सध्या राबविल्या जात असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही मूल्यमापन प्रक्रिया होणार आहे.

या परीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्तेचे कोठे आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीeducationशैक्षणिक