शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शाळांची होणार राष्ट्रीय ’ गुणवत्ता संपादन चाचणी, अमरावती  जिल्ह्यात १६३ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:06 IST

देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे निवडलेल्या १६३ शाळांमध्ये लेखी चाचणी, १३ नोव्हेंबर रोजी परीक्षाअभ्यासक्रमावर आधारित मूल्यमापन प्रक्रिया होणारपरीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणारप्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती : देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत चाचण्यांचा पर्याय शोधण्यात आला. ती गुणवत्ता तपासण्यासाठी देशातील सर्व राज्यांतील शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता वाढविण्यासाठी काम केले जाते. देशपातळीवर दिल्लीत ह्यन्यु प्राह्णतर्फे देशभरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. सीलबंद प्रश्नपत्रिका त्या-त्या शाळांच्या ठिकाणी पोहोचल्या असून परीक्षेच्या दिवशी ते फोडण्यात येतील. या चाचणीचे स्वरूप शिक्षक प्रश्नावली असे असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नावलीत पर्यायी प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्यायांना विद्यार्थ्यांनी गोल करणे अभिप्रेत आहे.

तिसरी, पाचवीसाठी ४५ गुण यामध्ये भाषा विषयासाठी १५ गुण, गणित विषयासाठी १५ आणि परिसर अभ्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. तर आठवीसाठी ६० गुण यामध्ये भाषा १५ गुण, गणित १५, सामान्य विज्ञान १५ गुण, समाजशास्त्र १५ गुण असणार आहेत. तिसरी व पाचवीसाठी ९० ते १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राखीव आहे.

चाचणीच्या दिवशी शासकीय स्तरावरून स्वतंत्र होत पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांच्यामार्फत परीक्षा नियंत्रित केली जाणार आहे. या चाचणीसाठी पाचपेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांची चाचणीसाठी निवड केली आहे. यात जिल्ह्यातील १६३ शाळांची निवड केली आहे. यात तिसरी, पाचवीतील प्रत्येकी ६१, तर आठवीच्या ६१ शाळा आहेत. यात १७३ वर्गांचा समावेश आहे.स्वतंत्र अभ्यासक्रम नाहीया परीक्षेच्या निमित्ताने अभ्यासक्रम कोणता, असा प्रश्न शाळांना पडला आहे. या चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. सर्व प्रश्न इयत्तेच्या क्षमतेवर आधारित असणार आहेत. त्यामुळे सध्या राबविल्या जात असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही मूल्यमापन प्रक्रिया होणार आहे.

या परीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्तेचे कोठे आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीeducationशैक्षणिक