शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्पर्धा परीक्षांची भरणार ‘शाळा’

By admin | Updated: October 5, 2016 18:34 IST

भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.05 -  भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने उपाय सुचविण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केले होती. या समितीने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रामुख्याने दहावीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिका-यांमार्फत किमान दोन दिवसांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, खासजगी संस्थांना अशी शिबीरे घेण्यास प्रोत्साहन देणे, करिअर मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना सहभागी करून घेणे, नागरी सेवेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अशा विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. 
स्पर्धा परीक्षांची माहिती पाठ्यपुस्तकातमध्ये उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. सर्वोच्च प्रशासकीय पदांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळणे, समाजोपयोगी कामाचे अधिकार मिळणे, त्यातून समाजाचा विकास साधणे या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी इंटरनेटवरील माहिती व वृत्तपत्रांचे वाचन वाढविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे.