शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीत अजूनही होतात बालविवाह

By admin | Updated: January 22, 2016 03:26 IST

पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही.

मुंबई : पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात अनुसूचित जातींमध्ये अल्पवयात विवाह करण्याचे प्रमाण आजही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. २०११च्या जनगणनेनुसार, १० ते १४ या गटातील १३ लाख ३१ हजार ९३० मुलांपैकी ४१, ४५२ मुलांचे याच वयात विवाह झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या बालविवाहांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून, २३,७५६ मुलींचा १४ वर्षे वयापर्यंत विवाह झालेला आढळून आला आहे. इतकेच नव्हे तर यातील १३८९ मुलींना याच वयामध्ये दुर्दैवाने वैधव्य आल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच १० ते १४ या वयोगटातील विवाह होणाऱ्यांपैकी १३३३ लोक विभक्त झाले आहेत, तर २७६ जणांचा घटस्फोट झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुलींना निरक्षर ठेवणे, मग मुलींचे अल्पवयात लग्न करून देणे आणि नंतर त्यांचा अल्पवयातील मृत्यू हे एक दुष्टचक्रच आहे. मुलींचा अल्पवयात विवाह झाल्यावर त्या स्वत:ची काळजी घेण्यासही सक्षम नसतात. अशा स्थितीत त्यांना गर्भधारणेला सामोरे जावे लागते, तसेच घरातील कामे, शेतीची कामेही त्यांच्या अंगावर पडतात. अपुरे पोषण झालेल्या मुलींचा प्रसूतीच्या वेळेस मृत्यू होण्याची शक्यता वाढते आणि त्यांची मुलेही कुपोषित जन्मतात. त्यामुळे सामाजिक कारणांनी तयार होणारे हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. - वंदना खरे, सामाजिक कार्यकर्त्याअनुसूचित जातींमधील लोकसंख्येपैकी १० ते १४ या वयोगटामध्ये झालेल्या ४१, ४५२ विवाहांपैकी २३,३१२ विवाह ग्रामीण भागात झालेले आहेत. त्यामध्ये ८०० मुलींना आपले अहेवपण गमवावे लागले असून, ८३७ जणांनी विभक्त होण्याचा आणि १६६ जणांनी घटस्फोट घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कमी प्रमाण, रूढी-प्रथांमुळे बालविवाहांची संख्या तेथे जास्त असल्याचे दिसून येते. आर्थिक दुर्बलतेमुळे व न परवडणाऱ्या आरोग्यसेवांमुळे या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच वयाच्या १४ वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील १२९९ विवाहितांना आपल्या जीवनसाथीचा मृत्यू पाहावा लागला आहे.