शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

अनुसूचित जातीत अजूनही होतात बालविवाह

By admin | Updated: January 22, 2016 03:26 IST

पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही.

मुंबई : पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात अनुसूचित जातींमध्ये अल्पवयात विवाह करण्याचे प्रमाण आजही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. २०११च्या जनगणनेनुसार, १० ते १४ या गटातील १३ लाख ३१ हजार ९३० मुलांपैकी ४१, ४५२ मुलांचे याच वयात विवाह झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या बालविवाहांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून, २३,७५६ मुलींचा १४ वर्षे वयापर्यंत विवाह झालेला आढळून आला आहे. इतकेच नव्हे तर यातील १३८९ मुलींना याच वयामध्ये दुर्दैवाने वैधव्य आल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच १० ते १४ या वयोगटातील विवाह होणाऱ्यांपैकी १३३३ लोक विभक्त झाले आहेत, तर २७६ जणांचा घटस्फोट झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुलींना निरक्षर ठेवणे, मग मुलींचे अल्पवयात लग्न करून देणे आणि नंतर त्यांचा अल्पवयातील मृत्यू हे एक दुष्टचक्रच आहे. मुलींचा अल्पवयात विवाह झाल्यावर त्या स्वत:ची काळजी घेण्यासही सक्षम नसतात. अशा स्थितीत त्यांना गर्भधारणेला सामोरे जावे लागते, तसेच घरातील कामे, शेतीची कामेही त्यांच्या अंगावर पडतात. अपुरे पोषण झालेल्या मुलींचा प्रसूतीच्या वेळेस मृत्यू होण्याची शक्यता वाढते आणि त्यांची मुलेही कुपोषित जन्मतात. त्यामुळे सामाजिक कारणांनी तयार होणारे हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. - वंदना खरे, सामाजिक कार्यकर्त्याअनुसूचित जातींमधील लोकसंख्येपैकी १० ते १४ या वयोगटामध्ये झालेल्या ४१, ४५२ विवाहांपैकी २३,३१२ विवाह ग्रामीण भागात झालेले आहेत. त्यामध्ये ८०० मुलींना आपले अहेवपण गमवावे लागले असून, ८३७ जणांनी विभक्त होण्याचा आणि १६६ जणांनी घटस्फोट घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कमी प्रमाण, रूढी-प्रथांमुळे बालविवाहांची संख्या तेथे जास्त असल्याचे दिसून येते. आर्थिक दुर्बलतेमुळे व न परवडणाऱ्या आरोग्यसेवांमुळे या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच वयाच्या १४ वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील १२९९ विवाहितांना आपल्या जीवनसाथीचा मृत्यू पाहावा लागला आहे.