शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

नाईक महामंडळात घोटाळे

By admin | Updated: May 18, 2016 05:16 IST

विमुक्त जमाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमध्ये गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत.

यदु जोशी,

मुंबई-वसंतराव नाईक विमुक्त जमाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमध्ये गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. या घोटाळ्यांची पाळेमुळे काही राजकीय व्यक्तींपर्यंत जात असल्याचे बोलले जाते. अहमदनगर, बीड, ठाणे, सांगली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये झालेले घोटाळे समोर आले असून, आणखी काही जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे झाले असण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळामार्फत सुमारे ६० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करताना बोगस प्रकरणे बनवून पैसे लाटण्यात आल्याच्या तक्रारी आता पोलिसांत होऊ लागल्या आहेत. ठाणे येथील महामंडळाच्या कार्यालयात बोगस कोटेशन बनवून मासेमारी व्यवसायासाठीची कर्ज प्रकरणे बनविण्यात आली. शांताराम राठोड या व्यक्तीने ती बनविली. या घोटाळ्यात तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक प्रल्हाद गजभिये यांचे नावही समोर आले आहे. कर्जाचे धनादेश लाभार्र्थींच्या नावे न काढता, ते राठोडच्या नावे काढून पुढे ती रक्कम गजभिये यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे, या प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याच्या योजनेत मोठे घोटाळे झाले. एकूण ५० प्रकरणे तयार करण्यात आली. त्याचे २.५० कोटी रुपये हे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत व्यवस्थापक असलेला योगेश सानप याच्या खात्यात जमा झाले. तो आणि त्याचा भाऊ गणेश सानप, तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र कांबळे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद चव्हाण, प्रल्हाद गजभिये आणि जिल्हा व्यवस्थापक अशोक नागरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातही अशीच प्रकरणे तयार करण्यात आली. महामंडळाचे एक कोटी रुपये योगेश सानपच्या खात्यात जमा करण्यात आले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर, ते लाभार्र्थींच्या नावावर दाखवून महामंडळाला पैसा परत देण्यात आला. महामंडळाने केलेल्या चौकशीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. सानप बंधू हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे निकटवर्ती मानले जातात. सांगली जिल्ह्यात कर्जवाटपासाठी पाठविण्यात आलेले १८ लाख रुपये महामंडळाच्या माजी अध्यक्षांच्या तोंडी सूचनेवरून आयोजनासाठी वापरण्यात आले. चौकशीत कांबळे आणि भालेराववर ठपका ठेवण्यात आला.>एकाच समाजाच्या लोकांना लाभविमुक्त जमाती व भटक्या जमातींसाठी हे महामंडळ असले, तरी विशिष्ट जिल्ह्यांमध्ये एकाच समाजाच्या लाभार्र्थींना लाभ देण्यात आला.बोगस कर्ज प्रकरणे बनवून निधी काही खासगी व्यक्तींच्या बँक खात्यात वळविण्यात आला.काही जिल्ह्यांमध्ये वसंतराव नाईक महामंडळामार्फत पैसा मिळवून देणाऱ्या टोळ्याच कार्यरत होत्या, अशी माहिती समोर येत आहे.दोन-तीन दिवसांत महामंडळाकडून सांगलीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदेडमधील कर्जवाटपात गैरप्रकार झाले आहेत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. बन्सोड यांनी सांगितले की, इतर काही जिल्ह्यांत असे प्रकार घडले काय, याची चौकशी केली जाईल.