शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:46 IST

आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले. 

मुंबई : ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असून, १२ जागांवर लढण्याचा फॉर्म्युला त्यांनी आघाडीला दिला आहे. आमचा फॉर्म्युला मान्य नसेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण तुमचा फॉर्म्युला काय ते तरी सांगा? असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले. 

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राज्यात दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. महाविकास आघाडीने या काळात ४० वेळा बैठका घेतल्या. एवढ्या बैठका होऊनही जेव्हा ४८ जागांचे वाटप होत नाही, त्यावेळी वेगळ्या चर्चांना उधाण येते. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील; या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व भाजपची सरळ-सरळ लढत होणार असल्याचे दिसते. असे असले तरी आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही हवी आहे. त्यामुळे भाजपला हरवणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.

...तर शिवसेना-वंचित फिफ्टी-फिफ्टी लढूआघाडीबाबत आमचे शिवसेनेशी बोलणे झाले आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत युती झाली नाही, तर आम्ही दोघेच फिफ्टी-फिफ्टी लढणार आहोत. २४ जागा ते लढतील. २४ जागा आम्ही लढू. त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचे अंडरस्टँडिंग काय हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यांनाच विचारा, असेही ते म्हणाले.

‘वंचित’ला सोबत घेतले पाहिजे: अशोक चव्हाण इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेतले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे; परंतु जागा किती द्याव्या लागतील, त्यांची इच्छा काय आहे, या सर्व गोष्टी चर्चेअंती स्पष्ट झाल्यानंतरच हा विषय सोडविला जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी नांदेडमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजकीय पक्ष दावे करतातच शिवसेनेने २३ जागांची मागणी केली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय पक्ष जिंकतील वा हारतील हा त्यांचा निर्णय आहे. असे असेल तर भाजपने निवडणुका लढवू नये आम्हीच लढू, अशी काही भूमिका घेणार आहात का?, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणElectionनिवडणूक