शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांना सावित्रीमाईंचे नाव! पुरस्कार प्रक्रिया होणार अधिक पारदर्शी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:16 IST

पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे. ते राज्यस्तरावर पाठविण्यासाठी जिल्हा समिती, राज्यस्तरावर आवश्यक निकषानुसार अंतिम निवडीबरोबरच ते शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यासाठी राज्य समितीची स्थापना करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 

मुंबई : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निकषात बदल करून हा पुरस्कार यापुढे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. बदललेल्या निकषानुसार या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षण विभागाने नेमून दिलेली विविध कार्य, उपक्रम, मूल्यमापन यासाठी १०० गुणांचे १७ निकष पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय साधारणतः मे महिन्यात शिक्षकांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, पुढील वेळापत्रकाप्रमाणे सप्टेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षण विभागाने काही अटी निश्चित केल्या असून त्यातील सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे शिक्षकांनी सादर केलेले पुरावे हे मुख्याध्यापकांनी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय शिक्षक, मुख्याध्यापकाची सेवा ही सलग किमान १० वर्षे असणारे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी शिक्षकाचे मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवालही विषयक राहणार असून त्यावर कोणतीही विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला या पुरस्कारासाठी पात्र ठरविता येणार नसून त्याच्या सेवेतील कार्यपद्धती आणि तो निर्व्यसनी असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्रही यासाठी आवश्यक असणार आहे. त्यामुळे यापुढे आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श अशाच शिक्षकांची निवड केली जाईल, तसेच याबाबतची निश्चितताही मिळेल, असा आशावाद व्यक्त करत शिक्षकांमधून सकारात्मक  प्रतिक्रिया उमटत आहेत. 

एकूण १०९ पुरस्कार प्राथमिक , माध्यमिक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक, विशेष कला / क्रीडा शिक्षक , दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक. स्काऊट / गाईड अशा विविध प्रवर्गातील एकूण १०९ पुरस्कार या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शाळांना दिले जाणार आहेत.

प्रस्तावांच्या छाननीसाठी समित्या -  पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे. ते राज्यस्तरावर पाठविण्यासाठी जिल्हा समिती, राज्यस्तरावर आवश्यक निकषानुसार अंतिम निवडीबरोबरच ते शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यासाठी राज्य समितीची स्थापना करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. -  शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या सात सदस्यीय राज्य निवड समितीमार्फत अंतिम निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याची पूर्ण जबाबदारी शिक्षण आयुक्तालयातील ई गव्हर्नन्सची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेTeacherशिक्षक