शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अडचणीत असलेल्या जिल्हा बँका वाचवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 00:53 IST

जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्य सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बँकेच्या मुख्यालयात बुधवारी साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांना राष्टÑीयीकृत बँक कधीच आपली वाटत नाही. त्याचा फक्त जिल्हा बँकेवर विश्वास असतो. त्यामुळे ही बँक संकटात आली की शेतकरी अडचणीत येतात. ज्या जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आजवर दिसले आहे. त्यामुळेच संकटातील जिल्हा बँकांना आता राज्य सहकारी बँकेने वाचवायला हवे. त्यासाठी राज्य सरकार शक्य असेल ती मदत करेलच.सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शिखर बँकेच्या शाखा मुंबईत कशाला हव्यात. त्याऐवजी या शाखा ग्रामीण भागात हलवा, अशी सूचना त्यांनी दिली.बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळातील सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे यांच्यासह बँकेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.भागभांडवलाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौनराज्य सहकारी बँकेत सध्या राज्य सरकारचे १०० कोटी भागभांडवल आहे. त्यावर बँकेकडून सरकारला दरवर्षी १० कोटी रुपयांचा लाभांश दिला जात आहे. जिल्हा बँकांना वाचविण्यासाठी बँकेला आता झपाट्याने विस्तार करायचा आहे. त्यासाठी निधीच गरज असल्याने राज्य सरकारने हे भागभांडवल किमान २०० कोटींनी वाढवावे, अशी इच्छा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली. पण मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे प्रशासकांचा हिरेमोड झाला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस