शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

अडचणीत असलेल्या जिल्हा बँका वाचवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 00:53 IST

जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्य सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बँकेच्या मुख्यालयात बुधवारी साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांना राष्टÑीयीकृत बँक कधीच आपली वाटत नाही. त्याचा फक्त जिल्हा बँकेवर विश्वास असतो. त्यामुळे ही बँक संकटात आली की शेतकरी अडचणीत येतात. ज्या जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आजवर दिसले आहे. त्यामुळेच संकटातील जिल्हा बँकांना आता राज्य सहकारी बँकेने वाचवायला हवे. त्यासाठी राज्य सरकार शक्य असेल ती मदत करेलच.सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शिखर बँकेच्या शाखा मुंबईत कशाला हव्यात. त्याऐवजी या शाखा ग्रामीण भागात हलवा, अशी सूचना त्यांनी दिली.बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळातील सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे यांच्यासह बँकेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.भागभांडवलाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौनराज्य सहकारी बँकेत सध्या राज्य सरकारचे १०० कोटी भागभांडवल आहे. त्यावर बँकेकडून सरकारला दरवर्षी १० कोटी रुपयांचा लाभांश दिला जात आहे. जिल्हा बँकांना वाचविण्यासाठी बँकेला आता झपाट्याने विस्तार करायचा आहे. त्यासाठी निधीच गरज असल्याने राज्य सरकारने हे भागभांडवल किमान २०० कोटींनी वाढवावे, अशी इच्छा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली. पण मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे प्रशासकांचा हिरेमोड झाला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस