शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

सवरांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: September 17, 2016 03:40 IST

आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई : आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील आदिवासी विकास विभागाचा हा हलगर्जीपणा असल्याची टीका केली आहे.बालकांच्या मृत्यूबाबत सवरा यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करताना विखे पाटील म्हणाले की, आदिवासी विकासमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून, शासकीय मदतीअभावी बालके मृत्युमुखी पडत आहेत. तरीही त्याची गंभीरतेने दखल न घेतली गेल्यामुळे राज्यपालांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची झाडाझडती घ्यावी लागली हे सरकारचे अपयश आहे.सरकारने आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचे दावे करून नेहमीप्रमाणे स्वत:ची पाठ थोपटून घेतली. सरकारचे हे सर्व दावे फोल ठरल्याचे बालमृत्यूच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होते, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंचा पंकजाच्या विभागावर हल्लाहलगर्जीपणा व असंवेदनशीलतेला आदिवासी विकास विभागाबरोबरच सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या खात्यांनाही लक्ष्य केले.पालघर व ठाणे जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त आदिवासी भागांचा आपण शनिवारी दौरा करणार असून, मोखाडा, खोच, खर्डी, कळंबवाडी, वाडा भागातील कुपोषणग्रस्त गावांना भेट देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.मुंबईसारख्या महानगरापासून जवळच असलेल्या आदिवासी भागाचे कुपोषण सोडवण्यात शासनाचे अपयश ही दुर्दैवी बाब असल्याचे मुंडे म्हणाले. निधीचे योग्य नियोजन नाही - तटकरेपालघरच्या मोखाडा तालुक्यातील ६०० कुपोषणग्रस्त मुलांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. आदिवासी विकास योजनांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही निधीचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप तटकरे यांनी केला.‘६०० मुले गेली तर जाऊ द्या ना मग..’ असे आदिवासी विकासमंत्र्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणजे संवेदनहीनतेचा कळस आहे, असे तटकरे म्हणाले.राष्ट्रवादीचे आ. पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्यासह कुपोषणग्रस्त मोखाडा भागाची पाहणी केली. राज्यात सर्वांत जास्त कुपोषण आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात असून, कुपोषण निर्मूलनात विष्णू सवरा निष्प्रभ ठरले असल्याचा आरोप बरोरा यांनी केला.सवरा यांच्या पुतळ्याचे ठाण्यात दहनठाणे : हे सरकार आदिवासी, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. आदिवासी मुलांचा कुपोषणाने जीव जात असताना आदिवासीमंत्री त्यांची टिंगल करत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातून आपला गाशा गुंडाळावा, अशी घोषणाबाजी करून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदिवासीमंत्री विष्णू सवरा यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी ठाण्यात दहन केले. पालघर जिल्ह्यात ३ आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. या कुपोषणावर बोलताना, विष्णू सवरा यांनी ६०० जण तर नाही मेले ना, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मध्यवर्ती पक्ष कार्यालयाबाहेर सवरा यांचा पुतळा दहन केला. हे आंदोलन पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मंदार केणी, संदीप जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.