शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

सवरांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: September 17, 2016 03:40 IST

आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई : आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील आदिवासी विकास विभागाचा हा हलगर्जीपणा असल्याची टीका केली आहे.बालकांच्या मृत्यूबाबत सवरा यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करताना विखे पाटील म्हणाले की, आदिवासी विकासमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून, शासकीय मदतीअभावी बालके मृत्युमुखी पडत आहेत. तरीही त्याची गंभीरतेने दखल न घेतली गेल्यामुळे राज्यपालांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची झाडाझडती घ्यावी लागली हे सरकारचे अपयश आहे.सरकारने आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचे दावे करून नेहमीप्रमाणे स्वत:ची पाठ थोपटून घेतली. सरकारचे हे सर्व दावे फोल ठरल्याचे बालमृत्यूच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होते, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंचा पंकजाच्या विभागावर हल्लाहलगर्जीपणा व असंवेदनशीलतेला आदिवासी विकास विभागाबरोबरच सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या खात्यांनाही लक्ष्य केले.पालघर व ठाणे जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त आदिवासी भागांचा आपण शनिवारी दौरा करणार असून, मोखाडा, खोच, खर्डी, कळंबवाडी, वाडा भागातील कुपोषणग्रस्त गावांना भेट देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.मुंबईसारख्या महानगरापासून जवळच असलेल्या आदिवासी भागाचे कुपोषण सोडवण्यात शासनाचे अपयश ही दुर्दैवी बाब असल्याचे मुंडे म्हणाले. निधीचे योग्य नियोजन नाही - तटकरेपालघरच्या मोखाडा तालुक्यातील ६०० कुपोषणग्रस्त मुलांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. आदिवासी विकास योजनांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही निधीचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप तटकरे यांनी केला.‘६०० मुले गेली तर जाऊ द्या ना मग..’ असे आदिवासी विकासमंत्र्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणजे संवेदनहीनतेचा कळस आहे, असे तटकरे म्हणाले.राष्ट्रवादीचे आ. पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्यासह कुपोषणग्रस्त मोखाडा भागाची पाहणी केली. राज्यात सर्वांत जास्त कुपोषण आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात असून, कुपोषण निर्मूलनात विष्णू सवरा निष्प्रभ ठरले असल्याचा आरोप बरोरा यांनी केला.सवरा यांच्या पुतळ्याचे ठाण्यात दहनठाणे : हे सरकार आदिवासी, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. आदिवासी मुलांचा कुपोषणाने जीव जात असताना आदिवासीमंत्री त्यांची टिंगल करत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातून आपला गाशा गुंडाळावा, अशी घोषणाबाजी करून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदिवासीमंत्री विष्णू सवरा यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी ठाण्यात दहन केले. पालघर जिल्ह्यात ३ आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. या कुपोषणावर बोलताना, विष्णू सवरा यांनी ६०० जण तर नाही मेले ना, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मध्यवर्ती पक्ष कार्यालयाबाहेर सवरा यांचा पुतळा दहन केला. हे आंदोलन पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मंदार केणी, संदीप जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.