शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:36 IST

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत उमदेवारी न दिल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.  मी भाजपमध्ये जाणार आणि मला मंत्रिपद सुद्धा मिळणारच असा दावा करणाऱ्या  सत्तारांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छा व्यक्त केलीच नसल्याचे दानवे म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता. विशेष म्हणजे सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र त्यांच्या प्रवेशाला सिल्लोडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना 'नो एन्ट्रीचा' सिग्नल दिला. तर सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छाच व्यक्त केली नसल्याचा दावा आता दानवे यांनी केला आहे.

भाजपमध्ये विरोध लक्षात घेता सत्तार हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा अलीकडील काळात पहायला मिळाली. या काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. मात्र याबाबतीत शिवसेनेकडून अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. तर भाजपमध्ये होत असलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतून सत्तार यांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.