शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

सतीश शेट्टींच्या पाठपुराव्याला अखेर यश, आयआरबीवरील दोषारोप; वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण १८ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:26 IST

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केल्याने शेट्टी यांच्या खुनाच्या तपासालाही गती मिळावी, अशी मागणी होत आहे. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी सांगितले की, सतीश यांच्या खुनामागील उद्देश माहिती करून घेण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जमीन अपहार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास स्वत:कडे घेतला होता़या गुन्ह्यात पुरावा असून दोषारोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असल्याचे व त्याच्या तपासातून हत्येचा उद्देश पुढे येण्याची शक्यता असल्याचे त्या वेळी न्यायालयात सांगितले होते़उच्च न्यायालयाने ८ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश देऊन या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला होता़ पण त्यानंतर तीनच दिवसांत सीबीआयने खुनाच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यासाठी बी समरी फाइल केली़ त्यानंतर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने आणि पुन्हा न्यायालयात जाऊ असे वाटल्याने सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले असावे असे दिसते.वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील सरकारी मारकीची ७३.८८ हेक्टर जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.दोषारोपपत्रातील कलमे मवाळ?सीबीआयच्या दोषारोपपत्रातील कलमे मवाळ वाटत आहेत. त्यात ४२० व ५११ कलमे आहेत. कलम ५११ त्यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसते़ गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचे हे कलम आहे़ दोषारोपपत्र वाचल्यानंतरच स्पष्टपणे बोलता येईल़- संदीप शेट्टी, सतीश शेट्टी यांचे भाऊम्हैसकर यांच्याविरुद्ध १५ आॅक्टोबर २००९ रोजी गुन्हाहीदाखल झाला होता. १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर या दोन्हीही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आला.शेट्टी हत्येच्या तपासातही गैरप्रकार झाल्याचे आरोप संदीप शेट्टीयांनी केले होते. अगोदर एका वकिलाला अटक केली होती. पोलीस अधिकाºयांनी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा आरोपही संदीप शेट्टी करत होते. पोलिसांवर दबाव असल्याने त्यांना याचा तपास करता आला नाही़ जनआक्रोश आणि संदीप शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा