शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सतीश शेट्टींच्या पाठपुराव्याला अखेर यश, आयआरबीवरील दोषारोप; वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण १८ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:26 IST

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केल्याने शेट्टी यांच्या खुनाच्या तपासालाही गती मिळावी, अशी मागणी होत आहे. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी सांगितले की, सतीश यांच्या खुनामागील उद्देश माहिती करून घेण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जमीन अपहार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास स्वत:कडे घेतला होता़या गुन्ह्यात पुरावा असून दोषारोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असल्याचे व त्याच्या तपासातून हत्येचा उद्देश पुढे येण्याची शक्यता असल्याचे त्या वेळी न्यायालयात सांगितले होते़उच्च न्यायालयाने ८ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश देऊन या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला होता़ पण त्यानंतर तीनच दिवसांत सीबीआयने खुनाच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यासाठी बी समरी फाइल केली़ त्यानंतर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने आणि पुन्हा न्यायालयात जाऊ असे वाटल्याने सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले असावे असे दिसते.वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील सरकारी मारकीची ७३.८८ हेक्टर जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.दोषारोपपत्रातील कलमे मवाळ?सीबीआयच्या दोषारोपपत्रातील कलमे मवाळ वाटत आहेत. त्यात ४२० व ५११ कलमे आहेत. कलम ५११ त्यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसते़ गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचे हे कलम आहे़ दोषारोपपत्र वाचल्यानंतरच स्पष्टपणे बोलता येईल़- संदीप शेट्टी, सतीश शेट्टी यांचे भाऊम्हैसकर यांच्याविरुद्ध १५ आॅक्टोबर २००९ रोजी गुन्हाहीदाखल झाला होता. १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर या दोन्हीही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आला.शेट्टी हत्येच्या तपासातही गैरप्रकार झाल्याचे आरोप संदीप शेट्टीयांनी केले होते. अगोदर एका वकिलाला अटक केली होती. पोलीस अधिकाºयांनी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा आरोपही संदीप शेट्टी करत होते. पोलिसांवर दबाव असल्याने त्यांना याचा तपास करता आला नाही़ जनआक्रोश आणि संदीप शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा