शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:20 IST

पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे.

मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी विधानपरिषदेत केले. ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असताना सुद्धा मागील दहा वर्षापासून रखडेलेली असून, हे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचे चव्हाण म्हणाले.

 पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे. सरकारने ४०० कोटीची योजना असताना सुद्धा यावर्षीच्या तरतूदीत फक्त  १५ कोटी रुपये दिले आहे. या भागातील आमदार संदीपान भुमरे शिवसनेचे तर खासदार रावसाहेब दानवे हे भाजपचे, मग सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा जायकवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावांची ही परिस्थिती असेल तर उर्वरित मराठवाड्याचे काय होणार असे चव्हाण म्हणाले. सरकारने ही योजना त्वरित पूर्ण करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

यावर उत्तर देताना, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, योजना जरी ४०० कोटीची असली तरीही एकाचवेळी संपूर्ण निधी देता येत नाही. मात्र आमचं सरकार आल्यापासून सर्वाधिक काम झाले आहे. या योजनेतील पंप हाउस पासून सर्व गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत. असे शिवतारे म्हणाले.

ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने लोकसभा निवडणुकीत या परिसरातील ५५ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आमदार बच्चू कडू दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.