शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:20 IST

पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे.

मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी विधानपरिषदेत केले. ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असताना सुद्धा मागील दहा वर्षापासून रखडेलेली असून, हे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचे चव्हाण म्हणाले.

 पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे. सरकारने ४०० कोटीची योजना असताना सुद्धा यावर्षीच्या तरतूदीत फक्त  १५ कोटी रुपये दिले आहे. या भागातील आमदार संदीपान भुमरे शिवसनेचे तर खासदार रावसाहेब दानवे हे भाजपचे, मग सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा जायकवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावांची ही परिस्थिती असेल तर उर्वरित मराठवाड्याचे काय होणार असे चव्हाण म्हणाले. सरकारने ही योजना त्वरित पूर्ण करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

यावर उत्तर देताना, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, योजना जरी ४०० कोटीची असली तरीही एकाचवेळी संपूर्ण निधी देता येत नाही. मात्र आमचं सरकार आल्यापासून सर्वाधिक काम झाले आहे. या योजनेतील पंप हाउस पासून सर्व गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत. असे शिवतारे म्हणाले.

ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने लोकसभा निवडणुकीत या परिसरातील ५५ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आमदार बच्चू कडू दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.