शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:20 IST

पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे.

मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी विधानपरिषदेत केले. ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असताना सुद्धा मागील दहा वर्षापासून रखडेलेली असून, हे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचे चव्हाण म्हणाले.

 पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे. सरकारने ४०० कोटीची योजना असताना सुद्धा यावर्षीच्या तरतूदीत फक्त  १५ कोटी रुपये दिले आहे. या भागातील आमदार संदीपान भुमरे शिवसनेचे तर खासदार रावसाहेब दानवे हे भाजपचे, मग सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा जायकवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावांची ही परिस्थिती असेल तर उर्वरित मराठवाड्याचे काय होणार असे चव्हाण म्हणाले. सरकारने ही योजना त्वरित पूर्ण करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

यावर उत्तर देताना, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, योजना जरी ४०० कोटीची असली तरीही एकाचवेळी संपूर्ण निधी देता येत नाही. मात्र आमचं सरकार आल्यापासून सर्वाधिक काम झाले आहे. या योजनेतील पंप हाउस पासून सर्व गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत. असे शिवतारे म्हणाले.

ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने लोकसभा निवडणुकीत या परिसरातील ५५ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आमदार बच्चू कडू दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.