शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पोलिस ‘सीईआयआर’ पोर्टलमुळे राज्यात अव्वल, नेमकं काय आहे पोर्टल, फायदा काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:11 IST

नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे पाऊल

सातारा : सातारा जिल्हा पोलिसांनी एक आदर्श उदाहरण निर्माण करत तब्बल २२०० हरवलेले मोबाइल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. ‘सीईआयआर’ पोर्टलचा वापर करून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. त्यामुळे सातारा पोलिसांची कार्यक्षमता (मुंबई प्रदेश वगळता) राज्यात ‘अव्वल’ ठरली आहे.मोबाइल हरवला की सामान्य माणसाची मोठी गैरसोय होते. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर त्यात असलेली वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. अशा परिस्थितीत पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे ठरले आहे. मोबाइल हरवल्यानंतर आपला मोबाइल पुन्हा पोलिस परत करतील, असे अनेक नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते; परंतु सातारा पोलिसांनी रात्रंदिवस पोर्टलद्वारे मोबाइल शोधून अनेक नागरिकांना सुखद धक्का दिला.

काय आहे सीईआयआर पोर्टल..मोबाइल हरवल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेले हे सीईआयआर पोर्टल आहे. आयएमईआय नंबरद्वारे मोबाइल ट्रॅक करून वापर बंद करता येतो. हरवलेला मोबाइल सापडल्यास त्याचा वापर पुन्हा सुरू करता येतो.

सातारा पोलिसांची कामगिरी..सातारा जिल्हा पोलिस दलाने २०२४-२५ मध्ये तब्बल २२०० मोबाइल शोधून काढले. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे.

या उपक्रमाचा फायदा..नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतोय. चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद घडत असेल तर पोलिसांना नागरिकांकडून तातडीने माहिती दिली जाते.

डिजिटल सुरक्षेला चालनासीईआयआर पोर्टल वापरून सर्वाधिक मोबाइल शोधून काढणारे सातारा पोलिस राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. सातारा पोलिसांचा हा उपक्रम केवळ मोबाइल परत मिळवण्यापुरता मर्यादित नसून तो सुरक्षित आणि जबाबदार समाजासाठीचा मोठा टप्पा आहे.

सातारा शहरची कामगिरी दमदारसातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शखाली सर्वात जास्त म्हणजे तब्बल ३०० मोबाइल पोलिसांनी शोधून काढले आहेत. परराज्यात गेलेले मोबाइल पोलिसांनी कुरिअरनेही मागवले आहेत.

भारत सरकार दूरसंचार विभागाचे पत्र‘सीईआयआर’मध्ये सापडलेल्या मोबाइल हँडसेटच्या जप्तीमध्ये जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी, दूरसंचार विभागाने एक रँकिंग फ्रेमवर्क तयार केला आहे. त्या सीईआयआर रँकिंग फ्रेमवर्कच्या आधारे, सातारा पोलिस जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील (मुंबई प्रदेश वगळता) सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा आहे. गोवा येथे ३ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक झोनल सुरक्षा परिषदेत पोलिस विभागातील प्रमुख कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत. ज्यांनी मोबाइल रिकव्हरी ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.