शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

सातारा पोलिस ‘सीईआयआर’ पोर्टलमुळे राज्यात अव्वल, नेमकं काय आहे पोर्टल, फायदा काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:11 IST

नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे पाऊल

सातारा : सातारा जिल्हा पोलिसांनी एक आदर्श उदाहरण निर्माण करत तब्बल २२०० हरवलेले मोबाइल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. ‘सीईआयआर’ पोर्टलचा वापर करून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. त्यामुळे सातारा पोलिसांची कार्यक्षमता (मुंबई प्रदेश वगळता) राज्यात ‘अव्वल’ ठरली आहे.मोबाइल हरवला की सामान्य माणसाची मोठी गैरसोय होते. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर त्यात असलेली वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. अशा परिस्थितीत पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे ठरले आहे. मोबाइल हरवल्यानंतर आपला मोबाइल पुन्हा पोलिस परत करतील, असे अनेक नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते; परंतु सातारा पोलिसांनी रात्रंदिवस पोर्टलद्वारे मोबाइल शोधून अनेक नागरिकांना सुखद धक्का दिला.

काय आहे सीईआयआर पोर्टल..मोबाइल हरवल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेले हे सीईआयआर पोर्टल आहे. आयएमईआय नंबरद्वारे मोबाइल ट्रॅक करून वापर बंद करता येतो. हरवलेला मोबाइल सापडल्यास त्याचा वापर पुन्हा सुरू करता येतो.

सातारा पोलिसांची कामगिरी..सातारा जिल्हा पोलिस दलाने २०२४-२५ मध्ये तब्बल २२०० मोबाइल शोधून काढले. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे.

या उपक्रमाचा फायदा..नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतोय. चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद घडत असेल तर पोलिसांना नागरिकांकडून तातडीने माहिती दिली जाते.

डिजिटल सुरक्षेला चालनासीईआयआर पोर्टल वापरून सर्वाधिक मोबाइल शोधून काढणारे सातारा पोलिस राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. सातारा पोलिसांचा हा उपक्रम केवळ मोबाइल परत मिळवण्यापुरता मर्यादित नसून तो सुरक्षित आणि जबाबदार समाजासाठीचा मोठा टप्पा आहे.

सातारा शहरची कामगिरी दमदारसातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शखाली सर्वात जास्त म्हणजे तब्बल ३०० मोबाइल पोलिसांनी शोधून काढले आहेत. परराज्यात गेलेले मोबाइल पोलिसांनी कुरिअरनेही मागवले आहेत.

भारत सरकार दूरसंचार विभागाचे पत्र‘सीईआयआर’मध्ये सापडलेल्या मोबाइल हँडसेटच्या जप्तीमध्ये जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी, दूरसंचार विभागाने एक रँकिंग फ्रेमवर्क तयार केला आहे. त्या सीईआयआर रँकिंग फ्रेमवर्कच्या आधारे, सातारा पोलिस जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील (मुंबई प्रदेश वगळता) सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा आहे. गोवा येथे ३ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक झोनल सुरक्षा परिषदेत पोलिस विभागातील प्रमुख कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत. ज्यांनी मोबाइल रिकव्हरी ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.