शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी लढणारा ‘साताराभूषण’ हरपला

By admin | Updated: December 13, 2015 01:05 IST

शरद जोशी यांच्या निधनाने हळहळ : संघटनेद्वारे सातारा मायभूमीत उभारली होती आंदोलने

सातारा : परदेशातील उच्च पदाची नोकरी सोडून ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी ज्यांनी उपाषणे केली, तुरुंगवास भोगला, असे शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा वाली हरपल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एक अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे शरद जोशी यांचे सातारच्या मातीशी भावनिक नाते आहे. त्यांचे वडील दिवंगत अनंतराव जोशी हे सातारा येथे पोस्टात नोकरीस होते. ३ सप्टेंबर १९३५ रोजी शरद जोशी यांचा जन्म शनिवार पेठेत झाला. वयाच्या तीन-चार वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण साताराभूमीत गेले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता. परदेशात उच्च पदावर नोकरी केली. भारतीय टपाल सेवेत कार्यरत असताना पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत त्यांचे विशेष योगदान होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुणे येथे शेती करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी आंदोलने उभारली.शेतकऱ्यांसाठी काम करत असताना साताऱ्यात अनेक सभा झाल्या. (प्रतिनिधी) शरद जोशी हे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने लढले. उच्च पदाची नोकरी सोडली. प्रथम स्वत: शेती केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने उभारली. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा भक्कम आधार हरपला आहे. सातारकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. - अरुण गोडबोले महिलांच्या हक्कासाठी यशस्वी लढे सातबारा उताऱ्यावर महिलांचेही नाव लागावे, यासाठी त्यांनी लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केले अन् लाखो महिलांची नावे सातबाऱ्यावर नोंदवली गेली. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी असे महिलांच्या हक्काचे लढे यशस्वी केले.