शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

शेतकऱ्यांसाठी लढणारा ‘साताराभूषण’ हरपला

By admin | Updated: December 13, 2015 01:05 IST

शरद जोशी यांच्या निधनाने हळहळ : संघटनेद्वारे सातारा मायभूमीत उभारली होती आंदोलने

सातारा : परदेशातील उच्च पदाची नोकरी सोडून ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी ज्यांनी उपाषणे केली, तुरुंगवास भोगला, असे शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा वाली हरपल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एक अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे शरद जोशी यांचे सातारच्या मातीशी भावनिक नाते आहे. त्यांचे वडील दिवंगत अनंतराव जोशी हे सातारा येथे पोस्टात नोकरीस होते. ३ सप्टेंबर १९३५ रोजी शरद जोशी यांचा जन्म शनिवार पेठेत झाला. वयाच्या तीन-चार वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण साताराभूमीत गेले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता. परदेशात उच्च पदावर नोकरी केली. भारतीय टपाल सेवेत कार्यरत असताना पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत त्यांचे विशेष योगदान होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुणे येथे शेती करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी आंदोलने उभारली.शेतकऱ्यांसाठी काम करत असताना साताऱ्यात अनेक सभा झाल्या. (प्रतिनिधी) शरद जोशी हे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने लढले. उच्च पदाची नोकरी सोडली. प्रथम स्वत: शेती केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने उभारली. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा भक्कम आधार हरपला आहे. सातारकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. - अरुण गोडबोले महिलांच्या हक्कासाठी यशस्वी लढे सातबारा उताऱ्यावर महिलांचेही नाव लागावे, यासाठी त्यांनी लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केले अन् लाखो महिलांची नावे सातबाऱ्यावर नोंदवली गेली. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी असे महिलांच्या हक्काचे लढे यशस्वी केले.