शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

शेतकऱ्यांसाठी लढणारा ‘साताराभूषण’ हरपला

By admin | Updated: December 13, 2015 01:05 IST

शरद जोशी यांच्या निधनाने हळहळ : संघटनेद्वारे सातारा मायभूमीत उभारली होती आंदोलने

सातारा : परदेशातील उच्च पदाची नोकरी सोडून ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी ज्यांनी उपाषणे केली, तुरुंगवास भोगला, असे शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा वाली हरपल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एक अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे शरद जोशी यांचे सातारच्या मातीशी भावनिक नाते आहे. त्यांचे वडील दिवंगत अनंतराव जोशी हे सातारा येथे पोस्टात नोकरीस होते. ३ सप्टेंबर १९३५ रोजी शरद जोशी यांचा जन्म शनिवार पेठेत झाला. वयाच्या तीन-चार वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण साताराभूमीत गेले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता. परदेशात उच्च पदावर नोकरी केली. भारतीय टपाल सेवेत कार्यरत असताना पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत त्यांचे विशेष योगदान होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुणे येथे शेती करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी आंदोलने उभारली.शेतकऱ्यांसाठी काम करत असताना साताऱ्यात अनेक सभा झाल्या. (प्रतिनिधी) शरद जोशी हे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने लढले. उच्च पदाची नोकरी सोडली. प्रथम स्वत: शेती केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने उभारली. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा भक्कम आधार हरपला आहे. सातारकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. - अरुण गोडबोले महिलांच्या हक्कासाठी यशस्वी लढे सातबारा उताऱ्यावर महिलांचेही नाव लागावे, यासाठी त्यांनी लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केले अन् लाखो महिलांची नावे सातबाऱ्यावर नोंदवली गेली. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी असे महिलांच्या हक्काचे लढे यशस्वी केले.