शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 19:14 IST

सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची  चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितलेकोणताही भ्रष्टाचार केलेला नाहीसंभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात घेतली बैठक

पुणे :  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ही संस्था टिकून राहण गरजेचे आहे. सारथी बंद होता कामा नये ही भूमिका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली आहे.      मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात संभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत  व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार,   प्रभारी  व्यवस्थापकीय संचालक विजया पवार, राजेंद्र कोंढरे, राजंद्र कुंजीर, शांताराम कुंजीर, सारथीतील कर्मचारी, विद्यार्थी, मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.     छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे. मोठ्या संर्घषांतून ही संस्था जन्माला आली आहे. सारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू,  प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.  मराठा समाजातील गरीबांचा गरजूंचा  फायदा होण्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. तो मूळ हेतू बाजूला राहता कामा नये. अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्यांवरून आणि नियुक्ती पत्रांवरून वाद  सुरू आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सध्या कोणतेही निर्णय घेऊन नये त्यांतून वाद चिघळत आहे, असे छत्रपती संभाजी राजेंनी अधिकाऱ्यांना सांगितले. ...................................................................................................      कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही डी. आर. परिहार म्हणाले की, मी कोणाताही भ्रष्टाचार केलेला नाही.माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. बार्टी संस्थेच कार्यरत असतांना मी कोणत्याही गाड्या खरेदी केल्या नाहीत. माझा अपमान करण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविला असून, कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. ...................................................................................................

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाGovernmentसरकार