शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

#सरळस्पष्ट मुंबईची तहान भागवणारी गावेच तहानलेली…राजकारणी गाढ झोपलेले!

By तुळशीदास भोईटे | Updated: April 2, 2018 19:14 IST

मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते.

पाण्याचा भरलेला ग्लास...हाती येतो...काही वेळा अवघा एक घोट घेऊन आपण तो तसाच सोडून देतो...काही सेकंदात हे सारं घडतं...बादलीभर पाणी...हंडाभर पाणी...तेही आपण काही सेकंदात फेकून देतो...मात्र त्याच बादलीभर...हंडाभर पाण्यासाठी काहींचा दिवसच नाही तर रात्रही जात असते...घोटभर पाणी मुखी लागावं यासाठी काहींना जीवाचा धोकाही पत्करावा लागतो...उगाचच काही तरी सनसनाटी सांगून तुम्हाला आम्ही खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करीत  नाही आहोत...हे सारं घडतंय...ते आपल्या राजधानी मुंबईतील मंत्रालयापासून अवघ्या ऐंशी किलोमीटरवर.... मंत्रालयातून दावे काहीही केले जावोत...पण हे भीषण वास्तव आहे...

हे वास्तव केवळ एका गावापुरते मर्यादित नाहीय...लोकमत न्यूज नेटवर्कचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी दिल्लीतून मिळवलेली आकडेवारी महाराष्ट्रातील पाणीबाणीची व्यापकता आणि गंभीरताही स्पष्ट करतेय...

 

महाराष्ट्रात पाणीबाणी

  • महाराष्ट्रातील गावांची एकूण संख्या    -   ४३, ६६५
  • पाणीटंचाईग्रस्त अर्ध्याहून जास्त – अंदाजे   २२,०००+
  • पाणीटंचाईग्रस्त खेडी                २६, ३४१
  • पाणीटंचाईग्रस्त वस्त्या             १२, ९५६

 

अर्ध्याहून जास्त महाराष्ट्राला ग्रासणाऱ्या पाणीबाणीचा वेध सातत्याने घेत www.lokmat.com सरळ-स्पष्ट वास्तव जसं आहे तसं मांडणार आहे...तुम्हाला वाटेल एसीमधून बाता मारल्या जातायत का...तर तसं नाही...हे जिथं आहे तिथं थेट जाऊन घेतलेला वेध...जमिनीवरचं दाहक वास्तव...स्वत: अनुभवून मांडलेलं...

 

मुंबईपासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर...पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका...ओंदे गावातील...जनाठे पाडा...पाणीबाणी असलेल्या महाराष्ट्रातील तेरा हजार वस्त्यांपैकी एक...तळपत्या उन्हात मी तेथे पोहचलो तेव्हा एवढं भीषण वास्तव पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं...

 

गावकरी पाणी कुठून भरतात असं विचारलं तेव्हा दूरवर बोट दाखवण्यात आलं...तेथे निघालो...रस्त्यात एक महिला तिच्या मुलांसह पाणी भरायला जाताना दिसली...तिच्याच मागे गेलो...विहिर आली...अरे पण हे काय...विहिरीत पाणी आहे तरी कुठे...तिनेच दाखवले...खोल खोल पाणी...म्हणजे तळाशी खडकांमध्ये साचलेलं डबक्यासारखं....

पाणी मिळवण्यासाठी दिवस रात्र झगडावं लागतं...ठेचाळत...धडपडत...अगदी जीव धोक्यात टाकावा लागतो...पाणी म्हणजे जीवन...जीवनासाठीच जीवन धोक्यात...

जे आधी आले त्यांना किमान तेव्हढं तरी पाणी मिळालं...काहींना तसंच परतावं...लागलं....त्यांच्याकडेही पाणी होतं...पण भांड्यात नाही...तर डोळ्यात...गच्च भरलेलं!

पालघर हा जिल्हा मुंबई-ठाणे परिसराला पाणी पुरवणारा जिल्हा...त्या जिल्ह्यातील पाणीबाणीबद्दल पालकमंत्री विष्णु सावरा हे सरकारी यंत्रणेची पाठ थोपटताना दिसतात. गेल्या वर्षापेक्षा आता टँकर कमी झाले. तरीही कुठे पाणी कमी पडू देणार नाही, यंत्रणेला तसं सांगितल्याचाही दावा करतात. पण ते सांगताना आपल्याच विक्रमगड मतदारसंघातील ओंदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनाठेपाडा ही वस्ती आहे. त्या वस्तीत पाण्यासाठी गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालावा लागतोय हे त्यांच्या गावीही नसावे!

मंत्रालयातील कागदावरील माहिती बिनदिक्कत मांडणारे आपले मंत्री कधी हे समजून घेतील की त्यामुळे ते भ्रामक वास्तव तयार करु शकतील...पण त्यांचं हे कागदावरचं पाणी सामान्यांची तहान कशी भागवणार?  

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळpalgharपालघरvishnu savaraविष्णू सावरा