शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 18:12 IST

सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात असं सदावर्तेंनी म्हटलं आहे. 

मुंबई - पावशेर दारू पिऊन जर कुणी भटक्या विमुक्त जातीजमातीचे मंत्री धनंजय मुंडे यांना अपमानित करण्याचं धाडस करत असेल, तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही. त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे यांची उंची किती, तुझे शिक्षण किती, काय बोलतो? सुरेश धस असतील, जरांगे पाटील असतील हे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रिपद न मिळाल्याने आरोप करतायेत. नगरसेवक होण्याच्या लायकीचे नाहीत. सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाची देण म्हणून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे मंत्री आहेत. सुपारी आणि मंत्रि‍पदाची लालसा यासाठी मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. जिथे दु:ख आहे तिथे तुम्ही शिमग्यासारखं वागतायेत. जातीय तेढ निर्माण करत आहेत. वाल्मिकी कराडला कोर्टाने दोषी ठरवले का, अटक करणे हा कायदेशीर भाग आहे. अटक केली म्हणून कुणी दोषी ठरत नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात. भटक्या विमुक्तांची इज्जत उघड्यावर टाकली जातेय. पावशेरची दादागिरी चालू देणार नाही. ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा दिला, जे बंद करतील ते बडतर्फ होतील. लोकशाहीने दिलेली पदे आहेत. ही पदे कुणाच्या बापाच्या घरची नाहीत. या पदावर राहून माज दाखवता येणार नाही. या पदावर राहून एखाद्या समाजाला दाबता येणार नाही. ग्रामपंचायत बंद करून दाखवली तर हायकोर्टात जाऊ, डंके की चोट हा इशारा देतोय असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

दरम्यान, कुणालाही अटक करण्याचा अधिकार सुरेश धसला आहे का, सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची पद्धत इस्लामिक देशात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही निर्माण केलेल्या देशात कायदा परिस्थिती हाताळण्यासाठी संविधान आहे. तुम्ही आग्रह करून कुणाला अटक करू शकत नाही. अटक केलेल्या व्यक्तीला मिनिटामिनिटाचा हिशोब द्यावा लागतो. उगीच कुणाला डांबून ठेवता येत नाही. सरकारने बीड प्रकरणी सीआयडी नेमली आहे त्यात लुडबूड कशाला करतायेत? वाल्मिकी कराडला कोणत्या न्यायालयाने दोषी ठरवलं आहे हे सांगावे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेSuresh Dhasसुरेश धसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण