शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 08:34 IST

तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; राज्यभरातील दिंड्या दाखल

देहूगाव (जि. पुणे) : वरुणराजाच्या अभिषेकात टाळ-मृदंगाचा कल्लोळ, विणेचा झंकार झाला आणि आषाढी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या वैष्णवांच्या बीजमंत्राने इंद्रायणी नदीकाठची देहूनगरी विठ्ठलमय झाली. 

पालखीच्या सुखसोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या आणि वारकरी देहूमध्ये गुरुवारी सायंकाळीच दाखल झाले होते. हरिभजन, कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शुक्रवारी पहाटे वारकऱ्यांनी इंद्रायणी स्नान केले. पहाटे पाचला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर साडेसहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात महापूजा झाली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवला होता. 

माउलींच्या पालखीचे आज प्रस्थानआळंदी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माउलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीनिमित्त संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माउलींच्या आषाढी पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. प्रस्थानानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर, आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा