शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:04 IST

हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल असं संजय राऊतांनी सांगितले.

मुंबई - काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाही. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती असल्याने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची हरकत नसल्याने वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे असं आम्ही मानतो असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहे. देशात हुकुमशाही नसावी यासाठी प्रकाश आंबेडकर राज्यात आणि देशात आवाज उचलतायेत. प्रकाश आंबेडकर केवळ राज्याचे नाही तर देशातील वंचिताचे नेते आहेत. त्यामुळे ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच जागावाटपाबाबत राज्यातील काँग्रेसमध्ये कुणाला अधिकार आहे मला माहिती नाही. काँग्रेसच्या हायकमांडने जी ५ सदस्य समिती बनवली आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू झालीय. प्राथमिक चर्चा आम्ही या समितीसोबत करत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सकारात्मक आहे. मतभेद दिसत नाही. शिवसेना-राष्ट्रवादीची चर्चा संपली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे असं राऊतांनी सांगितले. 

...हे लोकशाहीचे दुर्दैव

निवडणुका आता सहा महिन्यावर आल्या आहेत. १० जानेवारीला काय निकाल लागतो याकडे देशाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. राज्यात आणि देशात घटनाबाह्य सरकार सुरू असताना सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतायेत हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावर काही बोलणार नाही. अदानींना क्लीनचीट दिली मग इतरांना न्याय का मिळत नाही. घटनाबाह्य सरकारविरोधात राज्यातील जनता आवाज उचलतेय. कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहे. मग अद्याप आमदार अपात्रतेबाबत निकाल का लांबवला जातोय? अशा प्रकारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले की, या देशात उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नसल्याने तो आत्महत्या करतो. अदानींची संपत्ती ही भाजपाची संपत्ती आहे. त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही. धारावी, मिठागर, मुंबई देशातील एअरपोर्ट यासारखे एकाच उद्योगपतीला दिल्यावर अदानी श्रीमंत होणारच. श्रीमंत होण्यास हरकत नाही. परंतु सामान्य मजूर, कष्टकरी श्रीमंत झालाय का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय का? ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. भाजपाने यावर उत्तर द्यावे असं त्यांनी मागणी केली आहे.

देश ५ हजार वर्ष मागे जाईल

हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल. देश जर कुणी ५ हजार वर्ष मागे घेऊन जात असेल तर या देशात जंगल राहील आणि जंगलाचे कायदे येतील. देश पुढे जायला हवा. देशातील युवकांना रोजगार मिळायला हवा. शेतकऱ्यांना चांगले जीवन मिळायला हवे. कुणाला हे करायला जमत नसेल तर हा देश ५ हजार वर्ष मागे घेऊन जात लोकांना धर्माच्या नावावर तेढ निर्माण केले जात आहे असं राऊतांनी सांगितले. 

राहुल गांधींच्या यात्रेचा फायदा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेतून आम्हाला फायदा होईल. ज्या भागातून ही यात्रा जाईल तिथे काँग्रेसला मोठा फायदा होईल. या यात्रेतून वातावरण निर्मिती होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूकINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी