शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

संजय राऊतांचा 'लेटर बॉम्ब'; देवेंद्र फडणवीसांच्या शिलेदारावर ५०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 08:57 IST

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराची गैरव्यवहाराची प्रकरण म्हणजे सरळ सरळ ५०० कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केले आहे असा आरोप करत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले आहे.

मुंबई - हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सरकारवर लेटर बॉम्ब फोडला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. ५०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगमुळे शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसतं असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी पत्र पाठवून म्हटलंय की, आपल्या नेतृत्वाखाली सरकारने सहकारी क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले त्याबद्दल अभिनंदन. भाजपाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे या मताचा मी आहे असं त्यांनी म्हटलं. 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराची गैरव्यवहाराची प्रकरण म्हणजे सरळ सरळ ५०० कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केले आहे. कोल्हापूरातील हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात खाली आहे. हे सर्व प्रकरण तात्काळ ईडी, सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपा आमदार राहुल कूल आहेत. त्यामुळे या प्रकरणात संजय राऊतांनी थेट भाजपावर आरोप करत कारखान्याच्या संचालक मंडळाची यादी देवेंद्र फडणवीसांना पाठवली आहे. PMLA कायद्याने यावर कारवाई व्हावी आणि घोटाळे संचालक मंडळाने केले आहेत. त्याला राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. या शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सरकारी पाठिंबा आहे का? असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.