शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 10:32 IST

विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - हसन मुश्रीफ विरोधी पक्षात आहेत. जे एका विचारधारेविरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडतायेत. अनेकांना अटक झाली. हसन मुश्रीफांना तुरुंगात टाकण्याची भाषा काहींनी केली होती. ही भाषा भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याबाबतीतही झाली होती. परंतु ते सत्तेत गेल्याने त्यांना दिलासा मिळतो. विरोधकांवर दबाव टाकण्याचं राजकारण केले जाते. हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 

संजय राऊत म्हणाले की, विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते. काल सुप्रीम कोर्टात मी स्वत: होतो. सुनावणी झाली. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला त्यानंतर १४ फेब्रुवारी तारीख दिली. कोर्टात कामाचा फार लोड असतो. निवडणूक आयोगासमोरही सुनावणी झाली. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. स्वायत्त संस्थांवर राजकीय दबाव आहे. त्याचा ताणतणाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. पक्षपात आणि नि:पक्षपात हे नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते. देशातील वातावरण फारसं निर्मळ आणि स्वच्छ राहिले नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत देशात २० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिमांची आहे. इतर धर्मीयही लोक राहतात. जर  निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करण्यासाठी हिंदू-मुस्लीम असा वारंवार वापर केला तर देश पुन्हा एकदा तुटेल. पुन्हा विभाजनाची स्थिती निर्माण होईल. लोकांच्या मनात भीती निर्माण करून तुम्ही जास्तकाळ राजकारण करू शकत नाही. मोहन भागवत यांनी जे विधान केले त्यावर भाजपा नेत्यांनी विचार करायला हवा असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे होणार नाहीतभाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यासमोर एक विधान केले. त्यावर सामनानं अग्रलेख लिहिलाय. महाजन काय म्हणाले, शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते, ते आम्ही पूर्ण केले त्याचा आम्हाला आनंद आहे. हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केले. हे गंभीर आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळे, आम्ही हा निर्णय राष्ट्रवादी आणि शरद पवारांमुळे घेतला हा दावा वारंवार फुटीर गटाकडून केला जातोय. त्यावर गिरीश महाजनांनी पडदा टाकला. शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपाला संपवायची होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे करता येणार नाहीत. शिवसेना फोडल्याशिवाय त्यात अडथळा येणार नाही असं महाजनांना सूचवायचं होते. भाजपाच्या एका नेत्याने सत्य सांगितले त्याबद्दल गिरीश महाजन यांचे आभार मानतो असा घणाघातही राऊतांनी भाजपावर केला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHasan Mushrifहसन मुश्रीफEknath Shindeएकनाथ शिंदे