शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 11:31 IST

Sanjay Raut And Narendra Modi : हाथरसच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

हाथरस येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याच दरम्यान हाथरसच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

"नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे. गुहेत जाऊन तपश्चर्या करतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल तर ही भोंदूगिरी आहे असंही म्हटलं आहे. "हाथरसमध्ये भोले बाबा आहे... ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. ८० हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती. पण अडीच लाख लोक कसे जमले?"

"हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत आहेत. बुवा, महाराजांना राजकारणी प्रतिष्ठा देतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या दुर्घटना घडताता. देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे. गुहेत जाऊन तपश्चर्या करतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल तर ही भोंदूगिरी आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात. यांच्यावर कोण कारवाई करणार. लोक हतबल आहेत. नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत. पहिल्यांदा आपल्या महाराजांच्या तोंडून मणिपूरचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मणिपूर हा गंभीर विषय आहे हे त्यांना समजलं. लाडकी बहीण योजना आलेली आहे, आता लाडका शेतकरी योजना आणा. रोज दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी अद्याप भाष्य केलेलं नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी