शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिली श्रीरामांची उपमा; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावर बसून...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:23 IST

Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मुख्यमंत्री कार्यालयातून कुटुंबाचे प्राण वाचवले. सत्यवान, पवित्र असलेली ही व्यक्ती महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संवाद दौरा सुरू आहे. धाराशिव येथील एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा, केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीरामांची उपमा देत, कोरोना काळात महाराष्ट्र वाचवल्याचे म्हटले आहे.

शिवसेना सोडून गेलेल्यांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांना जायचे आहे, त्यांनी फडणवीस अनाजी पंतांकडे जावे, अजितदादा पवारांकडे जावे, नरेंद्र मोदींकडे जावे, जे मर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहावे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील कवडट शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे दिसत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ज्या हिमतीने उद्धव ठाकरे लढायला उभे राहिले आहेत, ते पाहता तुम्ही जय श्रीराम म्हणा, तुम्हाला मते मिळणार नाहीत. अजून मंदिरांची उद्घाटने करा, तुम्हाला मते मिळणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. 

आमच्या प्रभू श्रीरामाने मुख्यमंत्रीपदावर बसून कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी घेतली

शिवसेना नसती तर अयोध्येतील श्रीराम मंदिर झालेच नसते. हे महाशय गेले, रामाची प्राणप्रतिष्ठा करायला. सर्वांनी टीव्हीवर पाहिले. मात्र, प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की, नरेंद्र मोदीची हेच कळत नव्हते. प्रभू श्रीरामाची मूर्तीच दिसत नव्हती. हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदींवर होते. आम्ही रामाला शोधत राहिलो. हे यांचे असे सुरू होते, असे सांगताना, या आमच्या प्रभू श्रीरामाने मुख्यमंत्रीपदावर बसून कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी घेतली. एक कुटुंबप्रमुख म्हणून, आपला भाऊ म्हणून, आमचा मुलगा म्हणून, सर्व नात्यांनी संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी वाचवला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे रोज सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातील स्थितीची माहिती घेत होते. आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते. अशा या सत्यवान माणसाला, पवित्र माणसाला सोडून हे ४० गद्दार गेले. त्यांना जनता आणि देव माफ करणार नाही. हे लक्षात घ्या. मला खात्री आहे की, महाराष्ट्र याची जाणीव ठेवेल. महाराष्ट्र बेईमान नाही. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करतील, असे वातावरण आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना