शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

समृद्धी महामार्ग शापित, अपघातात बळी जातायेत; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 11:02 IST

संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई – समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या. त्या रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग, फळबागा उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यांचे श्राप आहेत. सबुरीने घेता आले असते. परंतु ज्यारितीने हा महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा परिणाम निरपराध जनता भोगतेय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. या अपघातांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ता आम्ही बनवला म्हणून श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला सांगत होते. मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जातायेत त्याचीही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पाहावे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही. कुठे थांबा नाही, लोकांच्या विश्रांतीची जागा नाही, काहीच नाही असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत मागे या महामार्गावर बस जळाली आणि ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा आम्ही सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होतायेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत. मग इथं कोण जाणार? संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायेत, छगन भुजबळ राजकारण करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईन असं शिंदे म्हणाले. आज मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चात हे उतरले होते. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला मुदत दिलीय. तुम्ही काय करणार आहात. याउलट तुम्ही महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करताय. छगन भुजबळ यांची विधाने राज्यातील समाजासमाजात फूट पाडण्याची आहेत. हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे. राज्यातील घटकांना अस्वस्थ करून एकतेला आग लावता येणार नाही असा आरोपही संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे