शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग शापित, अपघातात बळी जातायेत; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 11:02 IST

संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई – समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या. त्या रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग, फळबागा उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यांचे श्राप आहेत. सबुरीने घेता आले असते. परंतु ज्यारितीने हा महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा परिणाम निरपराध जनता भोगतेय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. या अपघातांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ता आम्ही बनवला म्हणून श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला सांगत होते. मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जातायेत त्याचीही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पाहावे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही. कुठे थांबा नाही, लोकांच्या विश्रांतीची जागा नाही, काहीच नाही असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत मागे या महामार्गावर बस जळाली आणि ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा आम्ही सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होतायेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत. मग इथं कोण जाणार? संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायेत, छगन भुजबळ राजकारण करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईन असं शिंदे म्हणाले. आज मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चात हे उतरले होते. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला मुदत दिलीय. तुम्ही काय करणार आहात. याउलट तुम्ही महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करताय. छगन भुजबळ यांची विधाने राज्यातील समाजासमाजात फूट पाडण्याची आहेत. हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे. राज्यातील घटकांना अस्वस्थ करून एकतेला आग लावता येणार नाही असा आरोपही संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे