शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

समृद्धी महामार्ग शापित, अपघातात बळी जातायेत; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 11:02 IST

संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई – समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या. त्या रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग, फळबागा उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यांचे श्राप आहेत. सबुरीने घेता आले असते. परंतु ज्यारितीने हा महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा परिणाम निरपराध जनता भोगतेय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. या अपघातांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ता आम्ही बनवला म्हणून श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला सांगत होते. मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जातायेत त्याचीही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पाहावे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही. कुठे थांबा नाही, लोकांच्या विश्रांतीची जागा नाही, काहीच नाही असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत मागे या महामार्गावर बस जळाली आणि ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा आम्ही सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होतायेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत. मग इथं कोण जाणार? संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायेत, छगन भुजबळ राजकारण करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईन असं शिंदे म्हणाले. आज मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चात हे उतरले होते. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला मुदत दिलीय. तुम्ही काय करणार आहात. याउलट तुम्ही महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करताय. छगन भुजबळ यांची विधाने राज्यातील समाजासमाजात फूट पाडण्याची आहेत. हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे. राज्यातील घटकांना अस्वस्थ करून एकतेला आग लावता येणार नाही असा आरोपही संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे