शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

“२०२४ ला केंद्रात-राज्यात आमचे सरकार, सगळ्याचा जाब द्यावा लागेल; हे लक्षात ठेवा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 13:49 IST

भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया सुरू असून, २०२४ आमचे सरकार येतेय हे यंत्रणांनी लक्षात ठेवले पाहिजे. हा इशारा नाही हे सत्य आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या स्थळी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी २०२४ रोजी केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येणार असल्याचा दावा करत, सगळ्याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा दिला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकरण का बंद केलं, या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? याशिवाय आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारेंनी एक प्रकरण बाहेर काढले, त्याची चौकशी का होत नाही? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

२०२४ ला केंद्रात-राज्यात आमचे सरकार, सगळ्याचा जाब द्यावा लागेल

महाराष्ट्रातही पोलीस दल, तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करत आहेत, त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचे वाचन करावे. जे कायदेशीर आहे ते करा, तुमच्या राजकीय बॉसचे खोटे आदेश पाळाल तर याद राखा. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही हे सत्य आहे. २०२४ मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावे. आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, २०२४ नंतर हे सगळे उलट होईल. मग प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

दरम्यान, आपल्याला लोकशाही मार्गाने विरोधकांचा पराभव करता येणार नाही म्हणून राजकीय विरोधकांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकायचे, त्यांच्यावर कारवाया करायच्या हे सत्र दिल्लीपासून राज्याराज्यात सत्ताधाऱ्यांनी आरंभलेले आहे. मात्र यामुळे इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. या कारवायांमुळे इंडिया आघाडीतून कोणता पक्ष बाहेर पडेल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना