शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:40 IST

Maharashtra News: हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Maharashtra Politics: नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे नेते मंत्री यांचा अयोध्या दौरा झाला. यानंतर बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. 

तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्यासोबत मंत्रिमंडळात असतील, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसत असाल तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. महाराष्ट्र तुम्हाला मिंधे म्हणत असेल तर त्यात महाराष्ट्राचे काय चुकले. तुम्ही केवळ नाराजी कसली व्यक्त करताय? मूळात बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये. बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री आणि त्यांची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या

याप्रकरणी खुलासे चालणार नाहीत, आणि तुम्ही नाराजी कसली व्यक्त करताय, तेही जमत नसेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. तसेच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

दरम्यान, बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. विषय गंभीर असून चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेchandrakant patilचंद्रकांत पाटील