शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

सांगली : सद्भावना एकता रॅलीत 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 16:04 IST

या रॅली दरम्यान 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या कांबळे (सांगली) असे मुलीचे नाव असून जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुख सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले आहेत.

सांगली : मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत रविवारी आयोजित केलेल्या सद्भावना एकता रॅलीनंतर ऐश्वर्या शाशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. रॅली संपवून घरी जाताना स्टेशन चौकात चक्कर आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.जिल्हा प्रशासनातर्फे कर्मवीर चौकातून सकाळी नऊ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह सांगली, मिरजेतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गावरून फिरून रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली. तिथे एकतेची शपथ दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.रॅली संपल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. ऐश्वर्या कांबळेही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत स्टेशन चौकमार्गे घरी निघाली होती. विठ्ठल मंदिरजवळ चक्कर आल्याने ती रस्त्यावर खाली बसली. शिक्षकांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तिने वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. तोपर्यंत ऐश्वर्याची प्रकृती अधिकच अत्यवस्थ बनली. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेमधून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रुग्णालयास भेट दिली. नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.दोन दिवसापासून आजारीऐश्वर्या गेल्या दोन दिवसापासून आजारी होती. तिला ताप व उलट्यांचा त्रास सुरु होता. वडिलांनी तिला शाळेला तसेच एकता रॅलीत जाऊ नकोस, असे सांगितले होते. पण तरीही ती रॅलीत सहभागी झाली होती. पण रॅली संपवून घरी जाताना तिला चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिचे कुटूंब राजवाडा चौकालगत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी वसाहतमध्ये राहते.घटना दुर्दैवीजिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, ऐश्वर्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ती गेले दोन दिवस आजारी होती. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.

टॅग्स :Sangliसांगली