शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:08 IST

पालकमंत्रीपदाची जवाबदारी कुणाकडे जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे.

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप आणि सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जवाबदारी कॅबिनेट मंत्री व शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाचा जीआर निघण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेने लढवलेल्या सर्व 6 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून आला नाही. त्यामुळे सहाजिकच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा शिवसेनेकडेचं असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्रीपदाची जवाबदारी कुणाकडे जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने जिल्ह्यात दोन मंत्रिपदे दिली आहेत. पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्री तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्रीपदाची जवाबदारी ही भुमरे यांच्याकडेच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवली आहे. मंत्रालयात बुधवारी चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महिती माध्यमांना दिली. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबत तिन्ही पक्षांत एकमत झालं असून खातेवाटपाचा निर्णयाच्या अंतिम स्वरूपापर्यंत तिन्ही पक्ष आले असून, आज यावर तोडगा निघणार असल्याचे सुद्धा पवार म्हणाले.