शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 21:12 IST

भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील अनावश्यक आणि जाचक ठरलेल्या ८ कोटींच्या सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊन वाहतूक कोंडी होत असताना आता सुशोभीकरणाच्या बांधकामात रिक्षांच्या मार्गिका नसल्याने रिक्षा रस्त्यावरच लागणार आहेत . त्यामुळे भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील याच उत्तरे कडील मार्गाने बाहेर पडतो . हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच ये - जा करतात . येथे रुंदीकरण म्हणून येथील बांधकामे आदी तोडण्यात आली . परंतु रुंदीकरण ऐवजी सुशोभीकरणचे मनमानी काम पालिकेने सुरु केले .  सुशोभीकरणाच्या कामासाठी २ कोटींचा प्रस्ताव तब्बल ८ कोटी रुपयांवर महापालिकेने नेला. पालिकेने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . त्यामुळे नागरिकांना येजा करणे अवघड झाले आहे . ह्या बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . 

प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते .  मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आहेच. 

या ठिकाणी सुरवातीला सुशोभीकरणाच्या आतील जागेत रिक्षांच्या दोन मार्गिका लागतील असे वाटले होते . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिकेने रिक्षा साठी जागाच ठेवली नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासहेब आंबेडकर मार्गा वर तसेच मोरवा आणि उत्तन अश्या चार मार्गावर रिक्षांच्या चार मार्गिका लागतात . परंतु सुशोभीकरणाच्या कामा मुळे आता रिक्षा ह्या मार्गिका ह्या कायमच्या भर रस्त्यात लागणार असल्याने रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे . वेळ पडल्यास रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा संघटनेचे रेमी डिसोझा व अन्य सहकारी यांनी दिला आहे . 

८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा अशी मागणी प्रवाशी तसेच नागरिक करत आहेत .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर