शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 21:12 IST

भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील अनावश्यक आणि जाचक ठरलेल्या ८ कोटींच्या सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊन वाहतूक कोंडी होत असताना आता सुशोभीकरणाच्या बांधकामात रिक्षांच्या मार्गिका नसल्याने रिक्षा रस्त्यावरच लागणार आहेत . त्यामुळे भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील याच उत्तरे कडील मार्गाने बाहेर पडतो . हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच ये - जा करतात . येथे रुंदीकरण म्हणून येथील बांधकामे आदी तोडण्यात आली . परंतु रुंदीकरण ऐवजी सुशोभीकरणचे मनमानी काम पालिकेने सुरु केले .  सुशोभीकरणाच्या कामासाठी २ कोटींचा प्रस्ताव तब्बल ८ कोटी रुपयांवर महापालिकेने नेला. पालिकेने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . त्यामुळे नागरिकांना येजा करणे अवघड झाले आहे . ह्या बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . 

प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते .  मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आहेच. 

या ठिकाणी सुरवातीला सुशोभीकरणाच्या आतील जागेत रिक्षांच्या दोन मार्गिका लागतील असे वाटले होते . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिकेने रिक्षा साठी जागाच ठेवली नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासहेब आंबेडकर मार्गा वर तसेच मोरवा आणि उत्तन अश्या चार मार्गावर रिक्षांच्या चार मार्गिका लागतात . परंतु सुशोभीकरणाच्या कामा मुळे आता रिक्षा ह्या मार्गिका ह्या कायमच्या भर रस्त्यात लागणार असल्याने रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे . वेळ पडल्यास रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा संघटनेचे रेमी डिसोझा व अन्य सहकारी यांनी दिला आहे . 

८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा अशी मागणी प्रवाशी तसेच नागरिक करत आहेत .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर