शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 21:12 IST

भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील अनावश्यक आणि जाचक ठरलेल्या ८ कोटींच्या सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊन वाहतूक कोंडी होत असताना आता सुशोभीकरणाच्या बांधकामात रिक्षांच्या मार्गिका नसल्याने रिक्षा रस्त्यावरच लागणार आहेत . त्यामुळे भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील याच उत्तरे कडील मार्गाने बाहेर पडतो . हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच ये - जा करतात . येथे रुंदीकरण म्हणून येथील बांधकामे आदी तोडण्यात आली . परंतु रुंदीकरण ऐवजी सुशोभीकरणचे मनमानी काम पालिकेने सुरु केले .  सुशोभीकरणाच्या कामासाठी २ कोटींचा प्रस्ताव तब्बल ८ कोटी रुपयांवर महापालिकेने नेला. पालिकेने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . त्यामुळे नागरिकांना येजा करणे अवघड झाले आहे . ह्या बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . 

प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते .  मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आहेच. 

या ठिकाणी सुरवातीला सुशोभीकरणाच्या आतील जागेत रिक्षांच्या दोन मार्गिका लागतील असे वाटले होते . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिकेने रिक्षा साठी जागाच ठेवली नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासहेब आंबेडकर मार्गा वर तसेच मोरवा आणि उत्तन अश्या चार मार्गावर रिक्षांच्या चार मार्गिका लागतात . परंतु सुशोभीकरणाच्या कामा मुळे आता रिक्षा ह्या मार्गिका ह्या कायमच्या भर रस्त्यात लागणार असल्याने रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे . वेळ पडल्यास रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा संघटनेचे रेमी डिसोझा व अन्य सहकारी यांनी दिला आहे . 

८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा अशी मागणी प्रवाशी तसेच नागरिक करत आहेत .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर