शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

सनातनवर बंदी घालाच!

By admin | Updated: September 20, 2015 01:00 IST

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर

पुणे/ कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. तर, या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट देणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात केली़पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राला वैचारिक स्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. ही परंपराच धोक्यात आणली जात आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांवर बंदीच आणायला हवी. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात प्रगती आहे, नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा मात्र अद्याप तपास नाही. राज्याचे गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात आहे, ते आणखी किती दिवस हे पद स्वत:कडे ठेवणार, आता त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) सहकारमंत्र्यांनीच प्रस्ताव आणावापानसरे यांच्या खुनामागे हिंदुत्ववादी संघटना नाहीत, अशी क्लीन चिट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती़ बजरंग दल, सनातन, आरएसएस या संघटना एकाच विचाराच्या जातकुळीतील आहेत़ या प्रकरणात पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा ‘सनातन’चा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे सहकारमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केली़ त्यांनी पानसरे कुटुंबीयांची सकाळी १० वाजता भेट घेतली़ या भेटीत पोलिसांनी हत्येमागील मास्टरमाइंड शोधून काढावा, तपास प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली़ या भेटीनंतर पानसरेंच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़तपासात हस्तक्षेप नाही - पाटीलपानसरे हत्येप्रकरणात जी काही कारवाई होईल, ती कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. यात राज्य शासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही व करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सनातन’ला क्लीन चिट देण्याचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. त्याचा साक्षात्कार राधाकृष्ण विखे-पाटील यांना आताच कसा झाला, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.