शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सनातनवर बंदी घालाच!

By admin | Updated: September 20, 2015 01:00 IST

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर

पुणे/ कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. तर, या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट देणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात केली़पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राला वैचारिक स्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. ही परंपराच धोक्यात आणली जात आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांवर बंदीच आणायला हवी. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात प्रगती आहे, नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा मात्र अद्याप तपास नाही. राज्याचे गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात आहे, ते आणखी किती दिवस हे पद स्वत:कडे ठेवणार, आता त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) सहकारमंत्र्यांनीच प्रस्ताव आणावापानसरे यांच्या खुनामागे हिंदुत्ववादी संघटना नाहीत, अशी क्लीन चिट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती़ बजरंग दल, सनातन, आरएसएस या संघटना एकाच विचाराच्या जातकुळीतील आहेत़ या प्रकरणात पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा ‘सनातन’चा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे सहकारमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केली़ त्यांनी पानसरे कुटुंबीयांची सकाळी १० वाजता भेट घेतली़ या भेटीत पोलिसांनी हत्येमागील मास्टरमाइंड शोधून काढावा, तपास प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली़ या भेटीनंतर पानसरेंच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़तपासात हस्तक्षेप नाही - पाटीलपानसरे हत्येप्रकरणात जी काही कारवाई होईल, ती कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. यात राज्य शासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही व करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सनातन’ला क्लीन चिट देण्याचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. त्याचा साक्षात्कार राधाकृष्ण विखे-पाटील यांना आताच कसा झाला, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.