शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

सनातनवर बंदी घालाच!

By admin | Updated: September 20, 2015 01:00 IST

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर

पुणे/ कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. तर, या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट देणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात केली़पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राला वैचारिक स्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. ही परंपराच धोक्यात आणली जात आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांवर बंदीच आणायला हवी. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात प्रगती आहे, नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा मात्र अद्याप तपास नाही. राज्याचे गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात आहे, ते आणखी किती दिवस हे पद स्वत:कडे ठेवणार, आता त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) सहकारमंत्र्यांनीच प्रस्ताव आणावापानसरे यांच्या खुनामागे हिंदुत्ववादी संघटना नाहीत, अशी क्लीन चिट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती़ बजरंग दल, सनातन, आरएसएस या संघटना एकाच विचाराच्या जातकुळीतील आहेत़ या प्रकरणात पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा ‘सनातन’चा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे सहकारमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केली़ त्यांनी पानसरे कुटुंबीयांची सकाळी १० वाजता भेट घेतली़ या भेटीत पोलिसांनी हत्येमागील मास्टरमाइंड शोधून काढावा, तपास प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली़ या भेटीनंतर पानसरेंच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़तपासात हस्तक्षेप नाही - पाटीलपानसरे हत्येप्रकरणात जी काही कारवाई होईल, ती कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. यात राज्य शासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही व करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सनातन’ला क्लीन चिट देण्याचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. त्याचा साक्षात्कार राधाकृष्ण विखे-पाटील यांना आताच कसा झाला, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.