शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 20:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे

Dada Bhuse on Tolls: कसारा- ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 20 मजूर ठार झाले. तर 3 गंभीर जखमी आहेत. क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान, तातडीने मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले. गेल्या काही दिवसांपासून टोल आणि रस्त्यांची अवस्था यावर बऱ्याच काथ्याकूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधान केले.

"रात्री 11.30 ते 12 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. पुलाचे काम तयार सुरू असताना हा अपघात झाला आहे. सिंगापूर यंत्रणाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. याआधी 94 पुलाचे काम याच कंपनीने केले आहे. मात्र दु्दैवाने ही घटना शहापूर परिसरात घडली. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू या अपघातात झाले आहेत . 3 जण जखमी आहेत अजून कोणी क्रेन च्या खाली अडकले आहेत का याबाबत शोध सुरू आहे. शोध कार्य झाल्यावर ही घटना कशी घडली याबाबत चौकशी केली जाईल. पण रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल", असे अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दादा भुसेंनी दिले. 

"महामार्गाचे काम सुरळीत सुरू आहे घाई घडबड होत आहे हे आरोप चुकीचे आहेत. 2024 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून हे काम सुरू आहे. रात्री आणि दिवसात काय काम करायचे आहे ते पाहूनच सुरू आहे," असे ते म्हणाले.

"1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह करण्याचं निर्णय राज्य सरकराने घेतले आहे. त्याच निर्णयानुसार आज नाशिक मध्ये देखील या सप्ताहाचे उद्घाटन झाले. 131 पेक्षा जास्त योजना महसूल विभागाचे आहेत. या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

"नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत. या दोन दिवसात याबाबत मी बैठक घेत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे प्रयत्न असेल. या महामार्गावर अनेक कट होते, त्यामुळे देखील ट्रॅफिक होत होते. 22 कट आम्ही आता बंद केले आहेत पोलीस याठिकाणी आता लक्ष देत आहेत. येणाऱ्या 8 दिवसात 50 टक्के तरी ट्रॅफिक कमी होईल. रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण हा विषय त्यांचा आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtollplazaटोलनाका