शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:56 IST

'मी जन्माने हिंदू आणि दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदू आहे, धर्म कधीच बदलला नाही.'

नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी आज निकाहनामा शेअर केला होता, ज्यामध्ये समीर यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले होते.

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीरने उत्तर दिले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. धर्म कधीच बदलला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीने लग्न करावे अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं, अशी महत्वाची माहिती त्यांनी दिली 

नवाब मलिकांना आव्हान...वानखेडे पुढे म्हणाले की, लग्न झाले त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. दोन वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हा एक विशेष करार असतो, यात धर्म बदलत नाही. काही काळानंतर आमचा कायदेशीर घटस्फोटही झाला आहे. मी जर धर्म बदलला असेल तर नवाब मलिकांनी त्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानही वानखेडे यांनी दिले.

नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोटनवाब मलिक यांनी समीर वानखेडेशी निगडीत लग्नाचे डॉक्युमेंड आज ट्विटरवर शेअर केले आहेत. हे समीर दाऊद वानखेडेचे लग्न असल्याचे त्यांनी फोटोसोबत लिहिले. तसेच, समीर यांचा विवाह डॉक्टर शबाना कुरेशी यांच्याशी 7 डिसेंबर 2006 रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम मुंबई येथे झाला, होता असे ते म्हणाले. नवाब मलिक यांनी जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे. 

नोकरीसाठी बनावट कागदपत्र बनवलेयावेळी मलिक यांनी नोकरीसाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोपही केला. समीर वानखेडेचे वडील हिंदू दलित तर आई मुस्लिम असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. लग्नानंतर वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. जेव्हा कोणी मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करतो तेव्हा त्याचा त्याच्या जुन्या जातीशी काहीही संबंध नसतो. मात्र समीर वानखेडे यांनी आरक्षणाचा वापर केला. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवून गरिबांच्या हक्कावर गदा आणली, असं मलिक म्हणाले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो