शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

'आरक्षण गेलं खड्ड्यात'; मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 19:46 IST

कॉलेजसाठी प्रवेश न मिळाल्याने मराठा विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘आरक्षण गेलं खड्ड्यात; सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत द्या’ अशी त्यांनी मागणी केली असून, त्यांच्या या ट्विटमुळे आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देआरक्षण गेलं खड्ड्यात, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायुवकाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर : कॉलेजसाठी प्रवेश न मिळाल्याने मराठा विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘आरक्षण गेलं खड्ड्यात; सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत द्या’ अशी त्यांनी मागणी केली असून, त्यांच्या या ट्विटमुळे आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

उस्मानाबाद येथील देवळालीचा मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे ‘आता आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,’ अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.संभाजीराजे म्हणाले, समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील किंवा विरोधी पक्षातील नेते असोत. ‘योग’ करीत आपण दोन मिनिटे शांत बसून विचार करू, की आपण का म्हणून राजकारणात आलो आहोत? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय? भाषणात बोलताना देशहित, समाजहिताच्या गोष्टी आपण करीत असतो; परंतु वास्तवात आपलं आचरण त्या प्रकारचं आहे का? की उगाच मुॅँह में राम, बगल में छुरी असा प्रकार चालू आहे ? नाही तर आज एवढा हुशार विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर आता खरी सुरुवात होती, असे उद्विग्न मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्यामुळे आपलं आज जिवंत असणे सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वत:ला संपवत आहेत? आपल्या ‘व्यवस्थे’तच मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्यांच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे आहेत.यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षच नाही, असे समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये,’ असे शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते, याची आठवणही संभाजीराजेंनी करून दिली आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर