शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 21:33 IST

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

नाशिक: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सुनावले आहे. 

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. पाऊस पडतो की नाही? याकडे लक्ष आहे. यामुळे आपण सर्वांनी या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीय केले पाहिजे. यासाठी आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या

एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार केले असते तर अशी वेळ आली नसती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. त्यावर त्यांनी बोलणे टाळले. तसेच जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या. सामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना थेट सुनावले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चौथ्या दिवशीही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. तर दुसरीकडे, बंडखोर आमदारांमधील काहींना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्विट, व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी