शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 21:33 IST

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

नाशिक: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सुनावले आहे. 

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. पाऊस पडतो की नाही? याकडे लक्ष आहे. यामुळे आपण सर्वांनी या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीय केले पाहिजे. यासाठी आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या

एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार केले असते तर अशी वेळ आली नसती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. त्यावर त्यांनी बोलणे टाळले. तसेच जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या. सामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना थेट सुनावले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चौथ्या दिवशीही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. तर दुसरीकडे, बंडखोर आमदारांमधील काहींना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्विट, व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी