शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 21:33 IST

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

नाशिक: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सुनावले आहे. 

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. पाऊस पडतो की नाही? याकडे लक्ष आहे. यामुळे आपण सर्वांनी या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीय केले पाहिजे. यासाठी आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या

एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार केले असते तर अशी वेळ आली नसती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. त्यावर त्यांनी बोलणे टाळले. तसेच जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या. सामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना थेट सुनावले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चौथ्या दिवशीही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. तर दुसरीकडे, बंडखोर आमदारांमधील काहींना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्विट, व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी