शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Sambhaji Raje Chhatrapati: “व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत”; संभाजीराजे संतापले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 09:55 IST

Sambhaji Raje Chhatrapati: महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Sambhaji Raje Chhatrapati: राज्यातील राजकारणात विरोधक महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप व शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राजकारणी सोडताना दिसत नाहीत. यातच ठाण्यातील घटनेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यातच आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत, हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजे यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीका करताना वापरलेल्या भाषेवरूनही संभाजीराजे यांनी कानपिचक्या दिल्या.

विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल

व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरेतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणे हे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले. 

दरम्यान, आताच्या घडीला महाराष्ट्र किती अडचणीत आहे, हेही बघितले पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत. हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती