शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:01 IST

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी राज्यातील अनेक भागात कोसळत आहेत. मंगळवारी मुंबई, उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजूसह अन्य पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट सवाल केले आहेत. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. यातच शेतकऱ्याला २४ तास बाकीची राज्ये वीज देतात. मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार?

अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? अशी विचारणाही संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. ते समजून घेतले आणि त्याचसाठी त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण सरकारने हाती घेणे खूप आवश्यक आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

स्वराज्य संघटना राजकारणात उतरवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझी सरकारला विनंती आहे की, आपला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तर आपण जगू हे विसरून चालणार नाही. उद्या दुष्काळ पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन योजना आणली पाहिजे. सरकारने अशी योजना आणली तरच शेतकरी जगू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन धोरण सरकारने आखावे, असे संभाजीराजेंनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती