शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:01 IST

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी राज्यातील अनेक भागात कोसळत आहेत. मंगळवारी मुंबई, उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजूसह अन्य पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट सवाल केले आहेत. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. यातच शेतकऱ्याला २४ तास बाकीची राज्ये वीज देतात. मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार?

अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? अशी विचारणाही संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. ते समजून घेतले आणि त्याचसाठी त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण सरकारने हाती घेणे खूप आवश्यक आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

स्वराज्य संघटना राजकारणात उतरवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझी सरकारला विनंती आहे की, आपला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तर आपण जगू हे विसरून चालणार नाही. उद्या दुष्काळ पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन योजना आणली पाहिजे. सरकारने अशी योजना आणली तरच शेतकरी जगू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन धोरण सरकारने आखावे, असे संभाजीराजेंनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती