शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:01 IST

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी राज्यातील अनेक भागात कोसळत आहेत. मंगळवारी मुंबई, उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजूसह अन्य पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट सवाल केले आहेत. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. यातच शेतकऱ्याला २४ तास बाकीची राज्ये वीज देतात. मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार?

अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? अशी विचारणाही संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. ते समजून घेतले आणि त्याचसाठी त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण सरकारने हाती घेणे खूप आवश्यक आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

स्वराज्य संघटना राजकारणात उतरवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझी सरकारला विनंती आहे की, आपला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तर आपण जगू हे विसरून चालणार नाही. उद्या दुष्काळ पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन योजना आणली पाहिजे. सरकारने अशी योजना आणली तरच शेतकरी जगू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन धोरण सरकारने आखावे, असे संभाजीराजेंनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती