शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या कुलकर्णी बंधूंचा समतेचा,स्त्री दाक्षिण्याचा पाडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 22:25 IST

दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो. भाऊबीजेचा अपवाद. पण नगरच्या भूतकरवाडीतील कुलकर्णी बंधुनी मात्र रूढी, परंपरेला छेद देत दिवाळी पाडव्याला परिवर्तनाची गुढी उभारली आहे. यादिवशी कुलकरण्यांच्या घरातील महिलांना पूर्ण विश्रांंती देत घरातील सर्व कामे पुरुष करतात.मंगला रघुनाथ कुलकर्णी या पंचाहत्तरीतील आजीबाई या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांची चार मुले सूर्यकांत व सर्वात धाकटा उमेश हे दोघे पुण्यात, दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रशेखर पैठण (औरंगाबाद) येथे वकील. तिसरे नंदकिशोर नगरच्या इंडियन सिमलेस कंपनीतून निवृत्त झालेले. उमेश यांनी दिवाळी पाडव्याला घरातील महिलांना पूर्णपणे विश्रांती देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी होकार दिला, अन कुलकर्णी परिवारात अनोखा दिवाळी पाडवा सुरू झाला. २०१३ पासून समतेची गुढी उभारून परिवर्तनवादी समतेची दिवाळी सुरु झाली.पाडव्याच्या दिवशी या परिवारात स्त्रियांचा कामाचा भार पुरुषच वाहतात. शुक्रवारी चारही भावांनी सकाळी आईची सुगंधी तेलाने मालिश करून तिला ओवाळले. नंतर प्रत्येकाने आपल्या पत्नीची सुगंधी तेलाने मालिश करून त्यांना ओवाळले. ओवाळणी म्हणून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावर्षी या घरात स्वावलंबनाची संकल्पना राबविली जात आहे. त्यानुसार घरातील प्रत्येक पुरुषाने आंघोळीनंतर आपापले कपडे धुवून टाकले. महिलांच्या फर्माईशीनुसार संध्याकाळी पुरुषांनीच पावभाजी तयार करून घरातील महिलांना ती खाऊ घातली. दिवाळीचा फराळसुद्धा पुरुषच बनवतात.पुणेकर उमेशने यावर्षीचा फराळ बनविला. यंदा चिठ्ठी काढून सकाळचा चहा नष्ट कोणी बनवायचा हे ठरलं. त्यानुसार गुरुवारी वकील चंद्रशेखर यांनी तर शुक्रवारी उमेश यांनी चहा नष्टा बनविला. भांडीसुद्धा या भावांनीच घासली, धुतली. नेहमी घरात स्त्रियाच राबत असतात, त्यामुळे आम्ही घरातील स्त्रियांवरील अन्याय नाही म्हणता येणार, त्यांच्यावरील भार कमी व्हावा म्हणून हि आगळी दिवाळी सुरु केली. मी पैठणला राहतो. त्यामुळे नाथांच्या घरची उलटी खुण म्हणतो तसे पाडवा हा पुरुषांच्या गौरवाचा, नाही तर स्त्रियांच्या गौरवाचा पाडवा सुरु केला. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना आम्ही राबवतो. गेल्यावर्षी आजची तरुणाई व त्यांच्या अपेक्षा या विषयावर घरातील पुतण्यांसाठी परिसंवाद ठेवला होता. त्याच्या आदल्या वर्षी कविता लेखन व कविता वाचन ठेवले होते.-चंद्रशेखर व उमेश कुलकर्णी, अहमदनगर.