शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!’ सलील कुलकर्णी उलगडणार कवितेचा गाण्यापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:13 IST

‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास, पुस्तकांच्या गावात उलगडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

मुंबई : ‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास, पुस्तकांच्या गावात उलगडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. शनिवार, दि. २३ डिसेंबर, २०१७ रोजी पुस्तकांचं गाव (भिलार) येथील श्री जननीमाता मंदिराजवळील सभागृहात दु. ३.०० ते सायं. ५.३० या वेळात डॉ. सलील कुलकर्णी ही शब्द-सुरांची मैफील सादर करणार आहेत.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अनेक संत कवयित्री आदी संत कवींपासून ते कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, सुधीर मोघे इत्यादी आधुनिक कवींपर्यंतच्या कवितांमधील लय व गेयता, कवितेचं गाण्यात होणारं अलगद रूपांतर आणि कवितेचा आशय यांबाबतचा रसास्वाद घेण्यासाठी दि. २३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील रसिकांनी पुस्तकांच्या गावी आवर्जून यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.

स्मरण विंदांचे (१६ सप्टेंबर), वाचन प्रेरणा दिन (१५ ऑक्टोबर), दिवाळी अंक प्रदर्शन व हीरक महोत्सवी दिवाळी अंकांच्या संपादकांचा गौरव (नोव्हेंबर) इत्यादी दर्जेदार कार्यक्रमांनंतर 'कवितेचं गाणं होतांना...' हा आणखी एक उत्कृष्ट कार्यक्रम पुस्तकांच्या गावी संपन्न होत आहे. सलील कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 'कवितेचं गाणं होतांना...' या संकल्पनेवर आधारीत मालिकेचे  २५ भाग वेबसीरीजच्या माध्यमातून प्रसारीत केले आहेत. या वेबसीरीजचा समारोप भिलारमध्ये होत आहे. या कार्यक्रमात कविता आणि गाण्यांचं सादरीकरण करत, सलील कुलकर्णी, त्यांनी स्वत: संगीत दिलेल्या गीतांबाबत आणि पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके आदि संगीतकारांच्या रचनांबाबतही,रसिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

निसर्गरम्य गाव, नीरव शांतता आणि सुमारे २५००० पुस्तकं यांचा हजारो रसिक-वाचक भिलारला भेट देऊन आनंद घेत आहेत. वाचनसंस्कृती संवर्धन साधणारे आणि साहित्यिक व सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारे, उपक्रम योजले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या गावी 'कवितेचं गाण होतांना...' हा आशयघन कार्यक्रम अनुभवण्यासाठी अवश्य यावे, असे आग्रही निमंत्रण रसिक-वाचक-पर्यटकांना देतानाच विनोद तावडे यांनी कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, अशी माहितीही दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईmusicसंगीत