शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘सखी सावित्री’ मिळवून देणार सुरक्षित शैक्षणिक वातावरण; समस्या सोडविण्यासाठी समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:37 IST

कोरोनामुळे पालकांच्या स्थलांतर आणि वाढते बालविवाह यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोविड- १९च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे तसेच त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शाळा, केंद्र आणि तालुका अशा विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत केली जाणार आहे.  

कोरोनामुळे पालकांच्या स्थलांतर आणि वाढते बालविवाह यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर घर, शाळा आणि समाजात सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने सखी सावित्री समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ च्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या समित्या स्थापन करण्यात येणार आहे. 

शाळा समिती आणि केंद्र समितीची महिन्यातून एकवेळा तर तालुका समितीची बैठक तीन महिन्यांतून एकवेळा घ्यावी लागणार आहे. या बैठकांमध्ये शाळा समितीने केंद्र समितीला तर केंद्र समितीने तालुका समितीला अहवाल सादर करावा लागेल. शाळा समितीवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्र समितीवर केंद्रप्रमुख तर तालुका समितीवर गट शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.काय असेल जबाबदारीआपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के मुला-मुलींची उपस्थिती साध्य करण्यासाठी नावनोंदणी करणे, विद्यार्थ्याचे समुपदेशन करणे अशी कार्ये या समित्यांना नेमून दिली आहेत. याशिवाय शासकीय योजनांची माहिती देणे, करिअरसंबंधी मार्गदर्शन, बालविवाहांबाबत जनजागृती , सीएसआरच्या माध्यमातून दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे ही जबाबदारी या समित्यांकडे आहे.