शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘सखी सावित्री’ मिळवून देणार सुरक्षित शैक्षणिक वातावरण; समस्या सोडविण्यासाठी समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:37 IST

कोरोनामुळे पालकांच्या स्थलांतर आणि वाढते बालविवाह यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोविड- १९च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे तसेच त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शाळा, केंद्र आणि तालुका अशा विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत केली जाणार आहे.  

कोरोनामुळे पालकांच्या स्थलांतर आणि वाढते बालविवाह यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर घर, शाळा आणि समाजात सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने सखी सावित्री समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ च्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या समित्या स्थापन करण्यात येणार आहे. 

शाळा समिती आणि केंद्र समितीची महिन्यातून एकवेळा तर तालुका समितीची बैठक तीन महिन्यांतून एकवेळा घ्यावी लागणार आहे. या बैठकांमध्ये शाळा समितीने केंद्र समितीला तर केंद्र समितीने तालुका समितीला अहवाल सादर करावा लागेल. शाळा समितीवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्र समितीवर केंद्रप्रमुख तर तालुका समितीवर गट शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.काय असेल जबाबदारीआपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के मुला-मुलींची उपस्थिती साध्य करण्यासाठी नावनोंदणी करणे, विद्यार्थ्याचे समुपदेशन करणे अशी कार्ये या समित्यांना नेमून दिली आहेत. याशिवाय शासकीय योजनांची माहिती देणे, करिअरसंबंधी मार्गदर्शन, बालविवाहांबाबत जनजागृती , सीएसआरच्या माध्यमातून दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे ही जबाबदारी या समित्यांकडे आहे.