शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू, उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन, जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:42 AM

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे.

शिर्डी : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.साईबाबा संस्थान आयोजित जागतिक साई मंदिर विश्वस्तांच्या परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले़ पोस्टाच्या ‘माय स्टॅम्प’चे व संस्थान व्यवस्थापनाच्या वर्षपूर्ती अंकाचे प्रकाशन करण्यात आले़ भाषणाची सुरुवात मराठीत करणाºया उपराष्ट्रपतींनी हिंदी, इंग्रजी, तेलगू व संस्कृत भाषेतून उपस्थितांशी हृदयस्पर्शी संवाद साधला़ वंचित आणि गरजूंची सेवा हीच खरी साई भक्ती व असाहाय्य लोकांविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी प्रार्थना आहे.पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते, असे ते म्हणाले़ साईबाबांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदान-प्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.उपराष्ट्रपतींनी काढली ‘लोकमत’ची आठवणउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी शिर्डीत कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला़ त्या वेळी त्यांनी ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित होतो, असे आवर्जून सांगितले. दिल्लीतील या गौरवपूर्ण कार्यक्रमातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला़मार्चमध्ये नाइट लॅण्डिंगमार्चमध्ये शिर्डी विमानतळावर नाइट लॅण्डिंग सुविधा सुरू होईल, अशी माहिती जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी दिली़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी हे वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ठिकाण असल्याचे सांगितले.देश-विदेशातील भाविकांचा मेळाविश्वस्तांच्या परिषदेसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. प्रतिनिधींच्या संख्येत मात्र घट झाली. गेल्या वर्षी देशातील अकराशे व विदेशातील ४४ मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते़ यंदा ही संख्या अनुक्रमे ६५० व १९वर आली आहे़ देश-विदेशात सार्इंचा प्रचार-प्रसार करणाºया चंद्रा भानू सत्पथी गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी हैदराबादेत परिषद आयोजित केल्याचे सांगण्यात येते़ त्यामुळे संख्येत घट झाल्याची शक्यता आहे़कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, लंडन व अमेरिकेतून १९ साई मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत़ सर्वाधिक ३१७ आंध्र प्रदेशातून, तर चंदीगड, हिमालच प्रदेश, केरळमधून प्रत्येकी एक मंदिर प्रतिनिधी आला आहे़ राज्यातील दीडशे साई मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत़ देशभरात जवळपास आठ हजार तर विदेशात पाचशे साई मंदिरे आहेत़

टॅग्स :saibabaसाईबाबा