शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

'या'साठी साहेबांना हवं होत मुख्यमंत्रीपद ! पिता पतंगरावांबद्दल बोलले विश्वजीत कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:25 IST

भविष्यकाळ कुणाला ठावूक नसतो. पण मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत राहील.

- राजा माने

मुंबई - काही महिन्यांपूर्वी सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर येथील जनतेच्या मदतीसाठी जीवाची परवा न करता मदतीला धावलेले आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक झाले होते. तेच विश्वजीत कदम आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे येथील जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर "लोकमत विथ लिडर" या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी विश्वजीत कदम यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच आपल्या वडिलांच्या पुण्याईमुळे आणि मागील सव्वा वर्षात केलेल्या कामामुळे आपल्याला जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  

- महापुराची पार्श्वभूमी लाभलेल्या मतदार संघातील विधानसभा निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं ?कदम : पलूस तालुका मतदासंघातील महत्त्वाचा तालुका आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं येथे महापूर येईल. अनेक गाव महापुरात बुडली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतीचं मोठं नुकसान झालं. येथील जनतेला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. परंतु, आपण महापुराच्या वेळी सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वत: मदतीसाठी उतरलो. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टरांचे पथक आणि विद्यार्थी तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मदतीला धावले. त्यामुळे मदत करणं शक्य झालं.

- महापुराच्या काळात विश्वजीत कदमांचं प्रतिसरकार मदतीला धावलं अशी भावना लोकांची आहे. हे कसं शक्य झालं ?कदम : मी पुढाकार घेतला, त्यानंतर लोकांची आणि कार्यकर्त्यांची साथ मला मिळाली. इतरांची साथ मिळविण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणे आवश्यक आहे. पहाटे दीड वाजेपर्यंत मी काम केलं. अनेक गावांत गेलो. स्वत: दुपारचे जेवन पुरग्रस्तांसोबत केलं. राज्य सरकार पुरस्थितीच्या काळात झोपलं होतं. त्यामुळे प्रतिसरकार उभं करावं लागलं. ही शोकांतीका असल्याचेही  कदम यांनी नमूद केले.  

- या निवडणुकीत विजयाचं गणित कसं मांडता ?कदम : आमच्या विजयाचं गणित लोक, कार्यकर्ते मांडत आहेत. खरं सांगायच तर आदरणीय पतंगराव कदम साहेबांच्या कामाच्या पुण्याई व्यतिरिक्त मागील सव्वा वर्षाचा कालावधी मी मतदारसंघातील कामात घालवला. कोणतही काम थांबवलं नाही. महापुरातील कामाच्या वेळी जनतेतून मला फार प्रेम आणि आदर मिळाला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मला या मतदारसंघातून मोठं मताधिक्य येथील जनता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- आपण प्रदेश कार्याध्यक्ष आहात. पण तुम्ही मतदारसंघात अडकून पडलात. राज्यात कुठेही फिरत नाहीत. अस का घडतयं ?कदम : तसं काही नाही. मी कालच पुरंदर, जत मतदार संघात प्रचारसभा घेतल्या. पुणे शहरातील तीन मतदार संघात सभा घेतल्या. येणाऱ्या दिवसांत सांगली, कवठे महाकाळ मतदार संघात जाणार आहे. परंतु, राज्याच्या दौऱ्यावर जाणे शक्य नाही. पक्ष श्रेष्ठींनी मला स्टार प्रचारक केले आहे. त्यामुळे स्टार प्रचारकाला हेलिकॉप्टर उपलब्ध होतात. परंतु, खराब हवामानामुळे ते शक्य नाही. तसेच प्रत्येक विभागातील काँग्रेस सक्षम आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल नक्कीच चांगला लागेल अशी खात्री कदम यांनी व्यक्त केली.  

- राज ठाकरेंना प्रबळ विरोधीपक्ष म्हणून समोर यायचंय. मग काँग्रेसची भूमिका काय ?कदम : राज ठाकरे पक्षाचे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातील विरोधीपक्षांच नेतृत्व करायची इच्छा असेल तर तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आता राज्यातील राजकीय समिकरणं बदलत चालली आहेत. एकच पक्ष सर्वकाही करू शकतो, अशी स्थिती नाही. आता इतर पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन पुढं जावं लागणार आहे.

पंतगरावजींना तब्बल दोन तप भावी मुख्यमंत्री बिरूद लागले. त्यांनी राज्यात कार्यकर्त्यांच मोहोळ तयार केलं. तुम्ही तसा प्रयत्न कधी सुरू करणार ?कदम : कदम साहेबांना लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आमच्या साहेबांनी माणस मिळवली. ही पुण्याई महाराष्ट्र पाहतोय. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. राजकारणात शुन्यातून उभारी घेतली. याचं सर्वांना कौतुक आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. मुख्यमंत्रीपद मिळाल नाही तरी ते आनंदी होते. परंतु, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी आणि येथील मातीसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं. ही त्यांच्या मनातील इच्छा होती, असंही कदम म्हणाले. भविष्यकाळ कुणाला ठावूक नसतो. पण मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत राहील.