शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

“जरांगेंमुळे अनेक जण खासदार, आता त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की...”; सदाभाऊ खोतांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 19:26 IST

Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील करत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या खासदारांकडून आता एक पत्र लिहून घ्यावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: सगेसोयरेच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. १३ जून रोजी सगेसोयरे अंमलबजावणी बाबतचे बेमुदत उपोषण सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन स्थगित करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. १२ दिवसानंतर त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन जरांगे पाटलांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. यातच सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे यांना एक आव्हान दिले आहे. 

मीडियाशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी करत असलेले काम कौतुकास्पद आहे. यावेळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपल्या आशीर्वादामुळे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक खासदार निवडून आले. माझी एक विनंती आहे की, या प्रत्येक खासदारांकडून एक पत्र लिहून घ्या की, मराठा समाजाला १०० टक्के ओबीसीमध्ये समावेश करायला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाज जोपर्यंत ओबीसीमध्ये जाणार नाही, तोपर्यंत हे खासदार तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील जनतेला हे समजणे महत्त्वाचे आहे

अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून लेखी लिहून घ्यावे. तसेच एक पत्र शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावे. सुप्रिया सुळे यांच्याकडून लिहून घ्यावे. रोहित पवार यांच्याकडून लिहून घ्यावे की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये १०० टक्के समावेश झालाच पाहिजे. असे पत्र जर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या खासदारांकडून लिहून घेतले, तर आम्हाला निश्चित समजेल की, मनोज जरांगे जे काम करत आहेत, ते योग्य दिशेने सुरू आहे. अशी जर पत्र लिहून घेतली नाहीत, तर जनतेत अशा प्रकारचा मेसेज जाईल की, मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत होते. हे कुठेतरी स्पष्ट होणे आणि महाराष्ट्रातील जनतेला समजणे महत्त्वाचे आहे, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे यांना आव्हान दिले आहे. 

दरम्यान, अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळ परिसरात गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती. त्याच बरोबर गावात प्रवेश करताच महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षण केले. पुष्पवृष्टी करून जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण