शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:11 IST

सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे. पण, मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

सोलापूर: युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यावरून आता भाजपसह अन्य पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरले आहात, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला. 

सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत, या शब्दांत सदाभाऊ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. या टीकेचाही सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा खोचक टोला सदाभाऊ यांनी लगावला.

दरम्यान, चांगले काम करण्यासाठी रामलल्लांचे आशीर्वाद असतील तर मुंबई महानगरपालिकेत रामराज्य आणू शकतो. शिवसेनेचे राजकारण आणि हिंदुत्व सर्वांना माहिती आहे. आमचे राजकारण सरळ आहे आणि आमचे हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चली आएं प्राण जाए पर वचन ना जाए हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही निवडणुकीत जी वचने देतो ती पूर्ण करतो. मग निवडणूक असो वा नसो, जिंकलो, हरलो तरी आम्ही दिलेले वचन पूर्ण करतो, असे आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAyodhyaअयोध्या