शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वसई-विरार पालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार; शिवसेनेने आखली रणनीति!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:35 IST

संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे शिवसेना नेत्याने स्पष्ट केले आहे.

वसई: मुंबई, ठाणेसह राज्यभरातील अनेकविध महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. यात वसई-विरार पालिकेचाही समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी बहुतांश सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आग्रही असून, त्यादृष्टीने रणनीति आखायला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेना युवानेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि नेते सचिन अहिर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सचिन अहिर यांनी वसईतील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आगामी वसई-विरार पालिका निवडणुकांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंच्या भूमिकेबाबत बोलताना, राज्यसभा निवडणुकांबाबत आम्ही शेवटपर्यंत नाव जाहीर केले नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आदर राहील. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहिर केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून नाव जाहीर झाल्यानंतर आता चर्चा नको. संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील

वसई विरारमध्ये बदल घडवायचा असेल, तर महाविकास आघाडीने एकत्र येणे गरजेच आहे. कार्यकर्त्यांनी परिवरर्तनाची जिद्द बाळगली पाहिजे. वसई विरारमधील निवडणुकात आदित्य ठाकरेंचा चेहरा असणार आहे. कारण वसई विरारमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. येथील जनतेला विकास पाहिजे आहे. येथील जनता जात धर्माच्या राजकारणात अडकत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील पालिका निवडणुका लढवल्या जातील, असे सचिन अहिर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, मनसेने घेतलेल्या भोंग्यांसंदर्भात बोलताना, राज ठाकरेंचा भोंगा आता बंद झाला आहे. भोंग्याची वायर, एम्पिलिफायर हे कुणाच होते. हे आता सर्वांना माहिती पडले आहे. ज्यांच्या भोंगा वाजवत होते, त्यांनीच आता त्यांच्यावर ट्रॅप करणार असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरेंना आता दुर्दैवानं प्रत्येक भूमिकेतून माघार घ्यावी लागत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAaditya Thackerayआदित्य ठाकरेElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना