शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वसई-विरार पालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार; शिवसेनेने आखली रणनीति!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:35 IST

संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे शिवसेना नेत्याने स्पष्ट केले आहे.

वसई: मुंबई, ठाणेसह राज्यभरातील अनेकविध महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. यात वसई-विरार पालिकेचाही समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी बहुतांश सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आग्रही असून, त्यादृष्टीने रणनीति आखायला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेना युवानेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि नेते सचिन अहिर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सचिन अहिर यांनी वसईतील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आगामी वसई-विरार पालिका निवडणुकांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंच्या भूमिकेबाबत बोलताना, राज्यसभा निवडणुकांबाबत आम्ही शेवटपर्यंत नाव जाहीर केले नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आदर राहील. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहिर केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून नाव जाहीर झाल्यानंतर आता चर्चा नको. संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील

वसई विरारमध्ये बदल घडवायचा असेल, तर महाविकास आघाडीने एकत्र येणे गरजेच आहे. कार्यकर्त्यांनी परिवरर्तनाची जिद्द बाळगली पाहिजे. वसई विरारमधील निवडणुकात आदित्य ठाकरेंचा चेहरा असणार आहे. कारण वसई विरारमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. येथील जनतेला विकास पाहिजे आहे. येथील जनता जात धर्माच्या राजकारणात अडकत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील पालिका निवडणुका लढवल्या जातील, असे सचिन अहिर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, मनसेने घेतलेल्या भोंग्यांसंदर्भात बोलताना, राज ठाकरेंचा भोंगा आता बंद झाला आहे. भोंग्याची वायर, एम्पिलिफायर हे कुणाच होते. हे आता सर्वांना माहिती पडले आहे. ज्यांच्या भोंगा वाजवत होते, त्यांनीच आता त्यांच्यावर ट्रॅप करणार असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरेंना आता दुर्दैवानं प्रत्येक भूमिकेतून माघार घ्यावी लागत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAaditya Thackerayआदित्य ठाकरेElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना