शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सबनिसांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त करायला हवी होती

By admin | Updated: January 15, 2016 01:51 IST

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे प्रतिपादन

सिद्धार्थ आराख/बुलडाणा: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे फार काही चुकले नाही, मला गोध्राकांडचे मोदी आवडत नाहीत., असं ते बोलले होते. हे वक्तव्य यापूर्वी अनेकांनी केलेले आहे.; मात्र सबनिसांच्या या वक्तव्यावरून उठलेल्या वादंगावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी, त्याचवेळी दिलगिरी व्यक्त केली असती तर एवढा स्तोम माजला नसता, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. डॉ. पानतावणे हे बुलडाणा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, ते लोकमतशी बोलत होते. अ.भा.मराठी साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडेल याबद्दल शंका नाही, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.आंबेडकरी चळवळीचे भवितव्य काय ?आंबेडकरी चळवळीत व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे चळवळ पतनाकडे चालली आहे., याला कोणी एक व्यक्ती नव्हे तर, सर्वच जबाबदार आहेत. प्रचंड अज्ञान असतानाही बाबासाहेबांचे नाव घेतले की, लोक टाळ्या देतात व आपलं नेतृत्व मान्य करतात, हा गैरसमज निर्माण झाल्याने चळवळ दिशाहीन होत चालली आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. दुर्दैवाने तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे आंबेडकरी चळवळ दिशाहीन होत चालली आहे.रिपाइंच्या विविध गटांचे नेते एकत्र का येत नाहीत ?सर्वच नेत्यांमध्ये अहंकार भरलेला आहे.; पण आता ऐक्य झालं पाहिजे, ते अपरिहार्य आहे. ऐक्यासाठी वामनदादासहीत आम्ही सर्व साहित्यिकांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. बैठक बोलाविली, सर्वच नेते हजर होते. त्यावेळी मी असे म्हटले होते की, नेत्यांना राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांनी बाबासाहेबांनी तयार केलेला शेड्युल कास्ट फेडरेशनचा निवडणूक जाहीरनामा वाचावा. यावर रा.सु.गवई यांना प्रचंड राग आला होता. तुम्ही आम्हाला आता प्रशिक्षण देणार काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. ऐक्याच्या बाबतीत वेळोवेळी हेच झालं. मी काय चुकीचं बोललो होतो. माझा तर दावा आहे की, प्रकाश आंबेडकरांसहीत एकाही नेत्यांनी बाबासाहेब पूर्णपणे वाचलेच नाहीत.केवळ जुजबी माहितीवर हे भाषण ठोकतात., नेत्यांनी आता बाबासाहेबांची राजकीय नीती समजून घेतली पाहिजे.रामदास आठवले नेहमीच वादग्रस्त वक्तव्य का करतात ?रामदास आठवले एक सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता आहे.; पण भाजपमध्ये त्यांची फरफट सुरू आहे. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की, हे भाजपवाले धोका देतील, मंत्रीपद वैगरे काही देणार नाही.; पण त्यांनी ऐकलं नाही. आता अस्तित्व टिकवण्यासाठी हे सारं बोलावं लागत आहे. बाबासाहेबांनीसुद्धा त्या-त्या परिस्थितीनुसार इतर पक्षांशी राजकीय तडजोड, नव्हे करार केले होते. त्यांनी आजच्या नेत्यांसारखी घटक पक्षांना बुद्धी सर्मपित केली नव्हती, एवढे भान नेत्यांनी ठेवलं पाहिजे,तरच राजकीय जीवनात नेते यशस्वी होतील.रिपब्लिकन नेत्यांसाठी आपली काय सूचना असेल ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष निर्माण करायचा असेल तर, बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा तयार केलेला जाहीरनामा आजच्या नेत्यांनी वाचावा आणि या जाहीरनाम्यातील काही अंशाचा जरी आपल्या राजकीय जीवनात वापर केला, तरी आंबेडकरी समाजाचे भले होईल. अस्मितादर्श साहित्य संमेलनाबद्दल काय सांगाल?१९७४ साली पहिले अस्मितादर्श साहित्य संमेलन भरले. तेव्हापासून आजतागायत ४८ वर्षात अस्मितादर्श या नियतकालिकाने व साहित्य संमेलनाने कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंतांच्या तीन पिढय़ा घडविल्या. अनेकांना लिहितं केलं. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरचे लेखक, कवी लिहू लागले. त्यांच्या भाषेत साहित्य तयार झाले. यावर्षीचे २१ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन वाशिम येथे होणार असून, प्रा. रवींद्र हडसन हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.